राजेंद्र पाटील राऊत
बरबड्यातील सोयाबीन चोरी प्रकरणातील टोळीस अखेर कूंटूर पोलिसांनी केले जेरबंद
नांदेड, दि.२५ – राजेश एन भांगे
नायगाव तालुक्यातील बरबडा येथील बाजार समितीत असलेल्या एका गोदामातून एक लाख बेचाळीस हजार आठशे रुपयाचे सोयाबीन चोरल्याची घटना १६ डिसेंबर रोजी घडली होती.याप्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. परंतु कुंटूर पोलिसांनी अतिशय बारीक लक्ष ठेऊन या चोरांना पकडण्यात यश मिळवलं आहे.
मौजे बरबडा येथील खाजगी गोडाऊन मधून 40 क्विंटल सोयाबीन चोरी प्रकरणी दिनांक 16/12/2020 रोजी गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यात अज्ञात आरोपी असल्यामुळे सपोनि करीम पठाण यांच्या मार्गदर्शनानुसार बीट जमादार नागोराव पोले,पोलीस नाईक भार्गव सुवर्णकार,पोलीस नाईक विजय आवुलवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयित व्यक्तींच्या हालचालीवर रात्रंदिवस विशेष लक्ष ठेवून व त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या सर्वांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. यात प्रथमेश प्रभाकर पंपटवार (वय 19 वर्ष ),
पवन प्रभाकर माचनवाड( वय 19 वर्षे),ओम माधव कुराडे ( वय 24 वर्ष), तिरुपती किशन ऊलगुलवाड (वय 22 वर्षे) सर्व राहणार बरबडा तर संभाजी बालाजीराव कवळे (वय 22 वर्षे) राहणार ईळेगाव ता. उमरी यांचा समावेश आहे.तसेच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन चार चाकी वाहन देखील कुंटूर पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे.
या पाचही आरोपीस प्रथम वर्ग नायगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पो.उपनिरिक्षक जांभुळकर साहेब करत आहेत.