राजेंद्र पाटील राऊत
सरपंच आरक्षण सोडतीला विरोध हायकोर्टात याचिका दाखल देगलूर,(संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)राज्य सरकारने घेतलेल्या ग्रामपंचायतीच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून, निवडणूकीनंतर आरक्षण सोडत नको, असे म्हणत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यातील 14234 ग्रामपंचायतीच्या सरपंचाची आरक्षण सुरू आहे. पण ग्रामपंचायतीच्या निर्णयाला आव्हान देणारी एक महत्त्वपूर्ण याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली आहे.औरंगाबाद खंडपीठातील वकील देविदास शेळके यांनी ही याचिका सादर केली आहे. निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढणे हा निर्णय घडत्या दृष्ट्या अवैध असल्याची भूमिका या याचिकेत घेण्यात आली आहे. ही याचिका अद्यापही न्यायालयाने दाखल करून घेतली नाही, मात्र या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी कोर्टाने सात तारखेला न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालय निर्णय देईल,याकडे राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे व अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.