Home पश्चिम महाराष्ट्र राजकीय आमदार शिंदे यांनी केलेल्या नियोजन व पाठपुराव्यामुळेच बिबट्याला ठार मारण्यात यश...

राजकीय आमदार शिंदे यांनी केलेल्या नियोजन व पाठपुराव्यामुळेच बिबट्याला ठार मारण्यात यश – या घटनेचे राजकीय भांडवल करू नये : राजेंद्र बारकुंड

375
0

राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक

राजकीय आमदार शिंदे यांनी केलेल्या नियोजन व पाठपुराव्यामुळेच बिबट्याला ठार मारण्यात यश – या घटनेचे राजकीय भांडवल करू नये : राजेंद्र बारकुंड  युवा मराठा प्रतिनिधी, महादेव घोलप
करमाळा : नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी आ.संजयमामा शिंदे यांचे योग्य नियोजन व पाठपुरावा तसेच त्याला ठार मारण्यासाठी काढलेली परवानगी यासाठी केलेले प्रयत्न यामुळे सर्वकाही शक्य झाले आहे . याचे श्रेय कोणीही न घेता त्याचे राजकीय भांडवल करू नये ; असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी केले आहे .याबाबत बोलताना ते म्हणाले , की कुंदेवाडी येथे नरभक्षक बिबट्याने हल्ला केल्यानंतर आ.शिंदे यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तात्काळ यंत्रणा कामाला लावली . त्यानंतरही बिबट्याने अंजनडोह येथे एका महिलेवर हल्ला करून ठार केले . त्यावेळी आ.शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनमंत्री तसेच वन अधिकारी यांचेकडे बिबट्याला ठार मारण्याची परवानगी तात्काळ मागितली . एवढेच नाहीतर तसा आदेशही तात्काळ मिळविला . त्यानंतर त्याला मारण्याची यंत्रणा वेगाने चालू झाली . तसेच पंचायत समिती कार्यालयात तालुक्याचे सर्व अधिकारी , कर्मचारी व पदाधिकारी यांची बैठक घेऊन सर्वांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या.

Previous articleमुखेड शहरात शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न…
Next articleअखेर चौपदरी नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची ई निविदा निघाली 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here