राजेंद्र पाटील राऊत
खाजगी शैक्षणिक संस्थांनी चालू वर्षी फी मागासवर्गीय विदयार्थ्यांना फी माफ करावी! अहमदनगर, (प्रतिनिधी :ज्ञानेश्वर बनसोडेयुवा मराठा न्युज नेटवर्क) –चालू वर्षी कोविड19 (कोरोना) या आजाराने थैमान घालून अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे,व अजूनही त्या आजाराची भीती संपलेली नाही, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने भीती पोटी लाँकडाऊन जाहीर करून सर्व शाळा ,महाविद्यालये व सर्व बाजारहाट, कार्यलयये बंद ठेवली, शाळा ,महाविद्यलयांनी ऑन लाइन अभ्यास सुरू केला, ही बाब अतिशय योग्य आहे, परंतु प्रत्येक्षात वर्गातील अभ्यास व ऑनलाइन अभ्यास यात जमीन अस्मानाचा फरक आहे, हे शिक्षण संस्था स्वतःच्या फायदयकरिता मान्य करीत नाही, ही बाब मात्र अयोग्य आहे,तश्यातच लाँकडाऊन मुळे कामधंदे पूर्ण बंद असल्यामुळे सर्वसामान्य जनता विशेषतः मागासवर्गीय जनता, की ज्या ना उदरनिर्वाहाकरिता काडीचीही तुटपुंजी साधन सामुग्री धनाढ्य लोकांसारखी उपलब्ध नसल्याकारणाने ही मागास वर्गीय जनता अतिशय मेटाकुटीला आली असताना या शैक्षणिक संस्थाचालकांनी फी थकबाकी करिता तगादा लावला आहे, मग पालकांनी लाँकडाऊन च्या काळात उदरनिर्वाह करीता व पोटाची खळगी भरवण्याकरिता केलेली उद्धार उसनवारी मिटवायची की श्याळेची थकीत फी भरायची असा मोठा प्रश्न या गरीब लोकांना पडला आहे,तश्यात या शैक्षणिक संस्था महाश्यांचे फी भरणे करीता सारखे पालकांना फोनकरून तगा दे लावले जातात, त्या मुळे अनेक पालकांच्या मनावर दडपण टेन्शन मुळे येऊन बी पी सारखे आजार वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे, आणि घरात तर रुपयाची ही आवक नाही थोडक्यात ,”येने चार आने व देने बार आने ” अशी अवस्था सध्या या गरीब पालक वर्गाची झाली आहे, यातून कंटाळून आत्महतेसारखेही प्रकार घडण्याची दाट शकता नाकारता येणार नाही थोडक्यात “घरात नाही दाना ,नि मला बाजीराव म्हणा अशीही पालक वर्गावर वेळ आली आहे, , आडात च नाही तर पोहऱ्या त कुठुन असे ही म्हटल्यास वावगे ठरू नये ,एकंदरीत, सारासार परिस्थितीचा विचार करता खाजगी शैक्षणिक सौंस्थनी मागास वर्गीय विद्यार्थनची चालू शैक्षणिक वर्ष्याची फी पूर्ण माफ करून पालक वर्गाला दिलासा द्यावा, अशी चर्चा मात्र सध्या मोठया प्रमाणात जोर धरू लागली आहे, या मागणीला यश येणेकमी मीडियाने आवाज उठ ऊन श्याशन दरबारी हे प्रकरण न्यावे , अशी ही मागणी पालक वर्गातून होत आहे, साध्य अहमदनगर जिल्ह्यतील शैक्षणिक सौंस्था फी चा तगादा लावण्यवर आघाडीवर आहेत, म्हणून वेळी च चपराक बसून फी थकीत विदयार्थ्यांना फी मुळे अडलेला शिक्षणाचा मार्ग खुला करण्यात यावा ,अशी ही मागणी होत आहे