Home Breaking News स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी झाडावर चढुन आत्मक्लेश आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी झाडावर चढुन आत्मक्लेश आंदोलन

120
0

 

बुलडाणा जिल्ह्यातील बोडखा शिवारात (संग्रामपुर तालुका )येथे  शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करण्यासाठी व दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढुन अर्ध नग्ण होऊन आत्मक्लेश आंदोलन केले आहे.
दिल्लीमधे गेल्या आठ दिवसापासुन लाखो शेतकरी आंदोलनाला बसले आहेत त्या आंदेलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे मा.खासदार राजु शेट्टी यांनी राज्यभर आंदोलन पुकारले आहे.
त्याच धर्तीवर संग्रामपुर तालुक्यातील बोडखा शिवारात झाडावर चढुन केंद्र सरकारचा निषेध करीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यानी अर्ध नग्ण होउन आत्मक्लेश आंदोलन केले.
झाडावर चढुन केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केल्या.
शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध असो,दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतक-यांना न्याय मिळालाच पाहीजे, अश्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलन दरम्यान शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करा.
दिल्लीत सुरु केलेल्या आंदोलकांच्या मागण्या मान्य करा अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. या मधे अनंता मानकर, नयन इंगळे, विलास बोडखे,मनोहर मोरखडे, प्रशांत बावस्कार, गोकुळ गावंडे,अमोल आगरकर, गजानन सोळे, प्रमोद बान्हेरकर, जया ठाकरे, विष्णुदास मुरुख, विशाल गव्हाळे, शिवचरण बान्हेरकर, निखिल गावंडे, महादेव तेल्हारकर, ऊमेश नेरकर,प्रतिक उमाळे, दामु सोळे, अक्षय नेरकर, शुभम ठाकरे, इत्यादीनी सहभाग घेतला होता.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleशिरोळ तालुका काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात निदर्शने
Next articleनायगाव पांचाळ यांनी केले जागतिक दिव्यांग दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here