Home मुंबई पुन्हा लॉक डाऊनकरण्याची वेळ येऊ नये यासाठी काळजी घ्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे...

पुन्हा लॉक डाऊनकरण्याची वेळ येऊ नये यासाठी काळजी घ्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन..

87
0

राजेंद्र पाटील राऊत

पुन्हा लॉक डाऊनकरण्याची वेळ येऊ नये यासाठी काळजी घ्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुंबई – दिवाळीनंतर देशात आणि महाराष्ट्रात पुन्हा कोरोना या साथ रोगाने डोके वर काढले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जास्त प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्याचे जनतेशी रविवारी22 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री संवाद साधला. लसीवर अवलंबून न राहता कोरोनाला रोखण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी. हा आपुलकीचा सल्ला त्यांनी जनतेला दिला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आज नेमकं काय बोलणार कुठला नवीन निर्णय जाहीर करणार याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात होते पण त्यांनी कुठलाही मोठा निर्णय जाहीर केला नाही उलट पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. गर्दी वाढली तरी कोरोना मरणार नाही उलट वाढणार आहे , ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना जास्त घातक आहे तरुणांपासून वृद्ध व्यक्तींना या आजाराची लागण होऊ शकते त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावीअनावश्यक घराबाहेर पडू नका कोरोना ची लक्षणे दिसली तर लगेच चाचणी करा गर्दी टाळा अनावश्यक ठिकाणी जाणे टाळा मास्क नेहमी वापरा हात धुवत राहा योग्य अंतर पाळा हेच कोरोना टाळण्याचे उपाय आहेत असे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले.

Previous articleअत्यंत जिद्दीने व हलाखीच्या परिस्थितीतून मिळवले बी.ए. एल.एल.बी .परीक्षेत यश
Next articleनांदेड जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा २ डिसेंबर पासून सुरु होणार – जिल्हा प्रशासनाचा निर्णय जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here