Home पुणे ‘ईगो’ (Ego) म्हणजे नक्की काय तर मी पणा ; ब्रिलियंट माइंड समुपदेशन...

‘ईगो’ (Ego) म्हणजे नक्की काय तर मी पणा ; ब्रिलियंट माइंड समुपदेशन व उपचार केंद्र च्या संचालीका तथा मानसोपचारतज्ञ,समुपदेशक डॉ. वैदेही जंजाळे

143
0

आंशुराज राजेंद्र पाटिल वेब एडिटर

‘ईगो’ (Ego) म्हणजे नक्की काय तर मी पणा ; ब्रिलियंट माइंड समुपदेशन व उपचार केंद्र च्या संचालीका तथा मानसोपचारतज्ञ,समुपदेशक डॉ. वैदेही जंजाळे

 

पुणे,दि. २० – अहंकार’ हा माणसाचा फार मोठा शत्रू प्रत्येक व्यक्ती अहंकारव्याप्त असते. कुणाला कर्तृत्वाचा अहंवार असतो. तो येता-जाता साऱ्यांना सांगतो, ‘मी शून्यातून जग उभ केलं आहे.’ अरे तू खरंच विश्वमित्र आहेस का? नवीन जग बनविणारा? कुणाला रूपाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला पदाचा तर कुणाला सत्तेचा अहंकार. साध्या शब्दात सांगता येईल की अहंकार म्हणजे मद, मस्ती, माज. अहंकारी माणसाजवळ विनम्रता नसते.मी म्हणजे मीच फक्त, हेच त्याच्या नसानसात भरलेलं असतं..कोणी तुमचा स्वाभिमान ठेचत असेल, कुणी तुम्हाला न्यूनगंड देत असेल, तर अशा व्यक्तीपासून दूर रहा. माणसाने स्वत:चे आत्मपरीक्षण करून दुसरा व्यक्ती माझ्याशी कसा वागत आहे ते लक्षात घावे.स्वत:चे स्वत्व कधीही घालवू नका. अहंकार आणि स्वाभिमान यातील फरक ओळखून वागायला ह व.एकदा एक कावळा आपल्या पंजात मांसाचा एक भला मोठ्ठा तुकडा घेऊन उडत चालला होता.
त्याचा विचार होता की एखाद्या शांत जागी उतरावे आणि तो मांसाचा तुकडा शांतपणे गट्ट करावा. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की काही गिधाडे त्याच्या मागे लागली आहेत.
ती गिधाडे बघुन तो कावळा घाबरला. त्याला वाटले की ती गिधाडे त्याला मारण्यासाठीच त्याच्या मागे लागली आहेत.
त्या गिधाडांच्या तावडीतुन सुटण्यासाठी तो कावळा आणखी जोरात आणि आणखी उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला. पण त्याने त्याच्या पंजात धरलेल्या मांसाच्या जड तुकड्यामुळे हे काही शक्य होईना.कावळ्याची चांगलीच दमछाक झाली. त्याला काही फार उंचावरून उडता येईना. एक गरूड ही गंमत बघत होता.
शेवटी तो गरूड पक्षी उडत कावळ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘का रे बाबा! काय भानगड आहे? तु एवढा घामाघुम का झाला आहेस?’तो कावळा म्हणाला, ‘ हे गरूडा! ही गिधाडे केव्हापासुन माझ्या मागे लागली आहेत. ती माझ्या जिवावर टपली आहेत. त्यांच्यापासुन बचाव करण्यासाठी मी अजुन उंचावरून उडायचा प्रयत्न करतो आहे. कावळ्याचे हे बोलणे ऐकुन तो गरूड म्हणाला,अरे ती गिधाडे तुझ्यामागे नाहीत,तर तुझ्या पंजात असलेल्या मांसाच्या तुकड्यासाठी तुझ्या मागे लागली आहेत.तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून उडता पण येत नाही. फेकुन दे तो मांसाचा तुकडा आणि बघ काय होते ते!’
कावळ्याने त्याप्रमाणे केले. त्याने तो मांसाचा तुकडा आपल्या पंजामधुन सोडुन दिला. मागे लागलेली सगळी गिधाडे त्या मांसाच्या तुकड्याकडे गेली.
मांसाच्या तुकड्याचे ओझे गेल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले आणि त्याने उंच भरारी घेतली.
आपण सगळेजण कावळेच आहोत आणि असाच एक जड तुकडा आयुष्यभर आपल्या डोक्यात ठेवून आपण जगत असतो. या तुकड्याचे नाव आहे ‘ईगो’ (Ego) म्हणजेच ‘मी’ पणा किंवा स्वतःविषयीच्या काही भ्रामक कल्पना..!आपण कोणीतरी खास आहोत, आपण फार हुषार किंवा बुद्धीमान आहोत,आपल्याला सगळे काही कळते किंवा समजते, आपण दादा आहोत,आपल्याकडे भरपूर शिक्षण किंवा संपत्ती आहे,माझ्याकडे पैसा भरपूर आहे अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असतात. आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा, घराण्याची अब्रु अशा नावाखाली अनेक जण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात. आपला ईगो कुरवाळत असतात.
मग या साठी शत्रुत्व आले तरी चालते, माणसे तुटली तरी चालतात,पण ज्यांना ‘ईगो’ नावाचा अवजड तुकडा सोडणे जमते तेच उंच भरारी घेऊ शकतात.एकदा तरी आपला ईगो बाजुला ठेवा.. विसरा..सोडून द्या..बघा काय चमत्कार होतो ते..!अहंकारात अहं म्हणजे मी प्रभावी असतो. व्यक्ती स्व-भोवती फिरते तेव्हा अहंकार पोसला जातो. हा ‘मी’ इतरांना तुच्छ मानू लागतो. एकटा पडतो. माणूस समाजनिष्ठ प्राणी आहे. एकटा जगू शकत नाही. ‘आम्हाला कोणाची गरज नाही. आमच्याजवळ सारे आहे’ असा अहंकार बाळगणारी माणसं विकृतीच्या जवळ गेलेली असतात.‘मी’चं आपण होणं म्हणजे अहंकाराला थोडंसं दूर करणं. अहंकारावर विजय मिळवायचा असेल तर रामकर्ता हा जप सतत करावा. मी कोणीच नाही ही भावना असावी. ‘अहं’चा त्याग केला की आपण सोSहं च्या मार्गावरून जातो.‘अहंकाराचा वारा न लागो मनाला‌’ असं समाजावलं की जगणं उज्ज्वल होतं..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here