Home Breaking News कोल्हापूरात तोफेच्या दारूचा स्फोट युवकाचा हात निकामी

कोल्हापूरात तोफेच्या दारूचा स्फोट युवकाचा हात निकामी

126
0

कोल्हापूर : दिपावली लक्ष्मीपूजनानंतर कोल्हापूर शहरात फटाक्यांची आतषबाजी झाली.
मंगळवार पेठेतील सिद्धाळा गार्डन परिसरात तर चक्क लक्ष्मीपूजनानंतर एका घराण्यात दरवर्षी तोफ उडविली जाते. या घराण्याच्या वतीने पूर्वी शहरातून श्री तुळजाभवानी देवीची सबिना मिरवणूक काढली जात असे; पण काळाच्या ओघात मिरवणूक बंद झाली. त्यातील धातूची तोफ आजही या घराण्याकडे आहे.
शनिवारी श्री लक्ष्मीपूजनानंतर रात्री दहाच्या सुमारास तोफ उडविण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भागातील तरुण जमले. त्याच वेळी तोफेचा पहिला बार उडविला. तोफ गरम असतानाच त्यात दुसऱ्यांदा शोभेची दारू ठासून भरत असतानाच अचानक या दारूचा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाज होऊन धूर पसरला. स्फोटामुळे तोफेत दारू ठेचणाऱ्या युवकाच्या हाताचा पंजा फाटून हातच निकामा झाला; तर बालाजी पार्क परिसरातील युवकाच्या डोळ्यात स्फोटाची दारू उडाल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तोफेचा गोळा तिसऱ्या युवकाच्या डोक्याला घासून गेल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने तो मोठ्या दुर्घटनेतून बचावला.

दरम्यान, रात्रीच जखमी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली; पण त्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी सकाळी पोलीस घटनास्थळी आले, त्यांनी पाहणी केली; कोणाचीही तक्रार नसल्याने पोलीस प्राथमिक चौकशी करून निघून गेले.

कोल्हापूर ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज नेटवर्क.

Previous articleबहिरेवाडीतील शहीद जवानावर उद्या होणार अंत्यसंस्कार
Next articleप्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली करतांना दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हदंडाधिकारी यांचे आदेश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here