Home Breaking News *मुंबईहून बेस्टची सेवा बजावुन* *आलेल्या इचलकरंजी एसटी.* *कर्मचाऱ्यांना कोरोना* *हतबल चालक वाहक...

*मुंबईहून बेस्टची सेवा बजावुन* *आलेल्या इचलकरंजी एसटी.* *कर्मचाऱ्यांना कोरोना* *हतबल चालक वाहक , हुकूमशाह अधिकारी*

133
0

*मुंबईहून बेस्टची सेवा बजावुन* *आलेल्या इचलकरंजी एसटी.* *कर्मचाऱ्यांना कोरोना*
*हतबल चालक वाहक , हुकूमशाह अधिकारी*मुंबई येथील बेस्टच्या मदतीसाठी कोल्हापूर विभागातुन इचलकरंजी आगारामधील 22 चालक 22 वाहक एकूण 44 एसटी कर्मचारी गेले होते.

मुंबईस पाठवताना प्रशासकीय प्रचलित नियम धाब्यावर बसवून , चढत्या क्रमाने ज्युनिअर कर्मचारी पाठवायचे असताना देखील आगारातील एका समूह गटातील कर्मचाऱ्यांच्या सगंनमताने ४४ कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय करण्यात आलाआहे.आलेल्या कर्मचाऱ्यांनी मागाणी करून ही कोरोना चाचणी कलेली नाही याची मा.जिल्हाधिकारी यांनी नोंद घ्यावी,
आपल्या अधिकार पदाचा गैर वापर करून कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने
मुंबई बेस्टच्या मदतीला पाठवले होते, मुंबईला जाण्यापूर्वी आगारातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांला निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे ही सांगण्यात आले होते.
इचलकरंजी आगारातील ४४ कर्मचारी जिवाची पर्वा न करता मुंबई येथे ड्युटीला गेले होते. परत आलेल्या कर्मचाऱ्यांचा इतर प्रवाशांशी थेट संबंध येत असुन त्यामुळे त्यांच्या नातेवाईक , तालुक्यात देखील कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई येथे गेलेल्या कर्मचाऱ्यांना नीट जेवनाची व्यवस्था देखील केली नव्हती .
गेल्या तिन महीन्यापासुन एसटी.कर्मचाऱ्यांचा पगार देखील झालेला नाही.
पण या सरकारला या कर्मचाऱ्यांचे कसलही सोयरं सुतक नाही.
सद्या मुंबईहुन सेवा बजावुन परत आलेल्या इचलकरंजी आगारातील तिन ते चार कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पाँझिटीव्ह आला असुन इतर चाळीस कर्मचाऱ्यां पैकी काहींचा अहवाल अजुन यायचा बाकी आहे , काही कर्मचारी भितीपोटी तपासणीसाठी गेलेले नाही,
पण मुंबईहून आलेल्या कर्मचाऱ्यांची साधी चौकशी सुद्धा आगारातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली नाही.
एखाद्या चुकीला कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी अधिकारी तातडीने कारवाई करत असतात पण जे कर्मचारी जीवाची बाजीलावून मुंबईहून परत आलै त्यांची साधी विचारपूस देखील केलेली नाही.
याची खंत इचलकरंजी आगारातील कर्मचाऱ्यांना वाटत आहे.
आधीच तिन महीने झाले पगार नाही,
कुठूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे ,
त्यातच मुंबईहून आलेल्यांना कोरोनाने हैराण केले आहे.
कर्मचाऱ्यांना इकडे आड तिकडे विहीर असे जगावे कि मरावे
झाले आहे.

Previous article*राज्यात २३ नोव्हेंबर पासुन शाळा सुरू होणार,* *शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड*
Next articleओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ; राष्ट्रीय अध्यक्ष रविकुमार स्वामी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here