Home Breaking News *रावेरमध्ये अल्पवयीन चार मुलांची निघृन हत्या*

*रावेरमध्ये अल्पवयीन चार मुलांची निघृन हत्या*

93
0

*रावेरमध्ये अल्पवयीन चार मुलांची निघृन हत्या*✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

रावेर शहरा जवळ असलेल्या बोरखेडा रस्त्यावर असलेल्या शेतातील एका सालदाराच्या घरात चार लहान अल्पवयीन मुलांचा निघृन हत्या झाल्याची घटना घडली. त्यामुळे रावेर परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चौघांचा कुऱ्हाडीने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी, श्वान पथक पोहचले आहे. तसेच पोलिस अधिक्षक देखील घटनास्थळी रवाना झाले आहे.
रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्‍तुफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दांपत्य आपल्या मूळ गावी मध्यप्रदेशातील गढी ( जि खरगोन ) येथे गेले असता घरात चारही मुले एकटी होती.
त्यातील सईता ( वय १२ वर्ष) रावल ( वय ११ वर्ष ) अनिल ( वय ८ वर्ष) आणि सुमन वय ३ वर्ष ) या चौघांचा खून झाल्याचे शेत मालकाला सकाळी आढळून आले आहे.
घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार यांच्यासह पोलीसांचा ताफा दाखल झाला आहे.

Previous article*वडगांव ग्रामदैवत* *श्री महालक्ष्मी देवीस चांदीची* *प्रभावळी लोकार्पण,*
Next article🛑 घसा खवखवतोय का ? दुर्लक्ष करु नये 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here