*रावेरमध्ये अल्पवयीन चार मुलांची निघृन हत्या*✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
रावेर शहरा जवळ असलेल्या बोरखेडा रस्त्यावर असलेल्या शेतातील एका सालदाराच्या घरात चार लहान अल्पवयीन मुलांचा निघृन हत्या झाल्याची घटना घडली. त्यामुळे रावेर परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चौघांचा कुऱ्हाडीने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी, श्वान पथक पोहचले आहे. तसेच पोलिस अधिक्षक देखील घटनास्थळी रवाना झाले आहे.
रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्तुफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दांपत्य आपल्या मूळ गावी मध्यप्रदेशातील गढी ( जि खरगोन ) येथे गेले असता घरात चारही मुले एकटी होती.
त्यातील सईता ( वय १२ वर्ष) रावल ( वय ११ वर्ष ) अनिल ( वय ८ वर्ष) आणि सुमन वय ३ वर्ष ) या चौघांचा खून झाल्याचे शेत मालकाला सकाळी आढळून आले आहे.
घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार यांच्यासह पोलीसांचा ताफा दाखल झाला आहे.