![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240428-WA0052.jpg)
![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20240114-WA0024.jpg)
(युवराज देवरे प्रतिनिधी दहिवड)
**बेमुदत आंदोलन**
नागिन बारी ते रामनगर,चिंचवे रस्त्याचे काम त्वरीत पुर्ण करावे.तसेच परसुल पांगळी नदी चिंचवे येथिल नदीवर ब्रिज पुल उभारण्यात यावा. आता नुकताच शेतकऱ्याचा शेतमाल उत्पादित होणार आहे आणि तो मालं मार्केट ला घेऊन जात असताना रस्त्याच्या खूप अडचणीचा सामना करावा लागतो. परसूल नदीला पाणी आल्याने ,२/३ महिने जाता येता येत नाही अशा अनेक अडचणी आहेत रस्त्याला पडलेले खड्डे ,रामनगर चींचवे रस्त्यावर टाकलेली खडी त्यामुळे होणारा त्रास अशा मागण्यासाठी निवेदन देण्यात आले.शेतक-यांना न्याय द्यावा.अन्यथा बेमुदत आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन बुधवार दिनांक ०७/१०/२०२० रोजी मा.प्रशासन नायब तहसीलदार काथेपुरे यांना देतांना प्रहार शेतकरी संघटना देवळा तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर, युवा सेना देवळा तालुकाध्यक्ष बापुसाहेब देवरे, शेतकरी राजेंद्र सोनवणे, संतोष सोनवणे.गोकुळ पानसरे.आदी उपस्थित होते.