मालेगाव परिसर
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
एके वेळी पावसाची वाट बघत बसलेला शेतकरी आता पावसाच्या सारख्या पडण्याला वैतागला आहे त्यातच पावसाने अजून शेतकऱ्याला त्याच्या हतातोंडी आलेला घास मका,भुईमुग,कांद्याचे ऊळे आणि ठीक ठिकाणी लागवड केलेला कांदा पूर्ण पणे जमीनदोस्त केला आहे.आता शेतकरी पूर्ण पणे हवालदिल झाला आहे १५००० रुपये भावाने पायली भर कांद्याचे बियाणे घेवून ही ते बियाणे पावसाच्या पाण्याने जमीनदोस्त झाले आहे. इतकी महागाई असताना सगळ्या पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्याचे आज खऱ्या अर्थाने कंबर तुटले आहे. सरकारकडे शेतकरी जर आशेने बघायला लागला तर सरकारचे लोक म्हणतात की एव्हढे असूनही रडतात साले, तेव्हा शेतकऱ्याने आपले दुःख आणि झालेले नुकसान ह्या बाबतीत सरकारला काही सांगावे की नाही हा प्रश्न पडतो आहे.
आता शेतकरी हा मनाला पटत नसले तरी सरकारच्या तूट पुंजा मदतीची आस लावून बसला आहे. कारण घरातले त्याने सगळे शेतात टाकुन उगवले आणि ते पावसाने पुन्हा मातीत मिसळवले…
युवा मराठा विभागीय संपादक निंबा जाधव