दि.२१/९/२०२०
भिला आहेर
देवळा:- अतिपावसाने खराब झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – स्वाभिमानी शेतकरी संघटना
सध्या देवळा तालुक्याच्या पूर्व भागात परतीच्या जोरदार पावसाने संपूर्ण शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासन स्तरावर याची तत्काळ दखल घेऊन नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा आशयाचे निवेदन देवळा तहसीलदार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ,तुषार शिरसाठ ,तालुकाध्यक्ष मधुकर पाचपिंडे ,राजेंद्र आहेर यांच्या वतीने देण्यात आले.




