*राज्यात एस.टी.बसला आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीला राज्य सरकारचा हिरवा कंदील*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज )*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील आंतर जिल्हा एसटी प्रवास बंद कऱण्यात आली होती .
यामुळे राज्यातील नागरिकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होत नव्हती. आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
अनेक दिवसांपासून एसटी सुरू करण्याबाबत नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती. त्यामुळे आता राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटी प्रवासाला मंजूरी देण्यात आली आहे. अर्थातच या प्रवासासोबत अनेक अटी शर्थी लागू असणार आहे. परंतु खासगी वाहनांसाठी ई-पास गरजेचा असणार आहे.
