![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240428-WA0052.jpg)
![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20240114-WA0024.jpg)
🛑 प्रवाशांच्या खिशाला कात्री; मुंबईत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 27 जून : ⭕ लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर आता हळू-हळू जीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. काही व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगीही दिली आली आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. मात्र, रिक्षा टॅक्सी सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास महाग होणार आहे. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये दोन ते तीन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
खटुआ समितीने सादर केलेल्या अहवालाच्या शिफारशीनंतर मुंबईतील रिक्षा-टॅक्सीच्या दरांबाबत मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणनं (एमएमआरटीए) हिरवा कंदिल दाखवला आहे. आरटीओ आणि ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियन मिळून दरवाढीचा आकडा ठरवल्यानंतर एमएमआरडीएकडून रिक्षा टॅक्सींच्या नवीन भाडेसूत्राच्या शिफारसीला मंजुरी देण्यात येईल. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिफारसीला मंजुरी मिळाल्यास दोन ते तीन रुपयांपर्यंत भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनंतर भाडेवाढ झाल्यास प्रवाशी वर्गाला याचा चांगलाच फटका बसणार आहे. पण, रिक्षा , टॅक्सी चालकांसाठी ही दिलासादायक बाब असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. लॉकडाऊनमध्ये रिक्षा व टॅक्सीचालकांचं आर्थिक उत्पन्न बंद झालं होतं. अनेकांची गाड्यांचे हप्ते थकले आहेत. भाडेवाढीमुळं आम्हाला हप्ते फेडणे सुकर जाईल. तसंच गेल्या तीन महिन्यांपासून काम नसल्यानं शिल्लक रक्कमही आता संपत आली आहे. त्यामुळं जर भाडे वाढ झालीस अनेक चालकांना पुन्हा नव्याने काम सुरू करण्यास चालना मिळेल. असं ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष यांनी सांगितलं.
मात्र, असं असलं तरी प्रवासी हक्क कार्यकर्त्यांनी भाडेवाढीला विरोध केला आहे. करोना संकटाच्या काळात झालेली हा भाडेवाढ सामान्य नागरिकांना परवडणार नसल्याचं त्याचं म्हणणं आहे.⭕