Home Breaking News नांदेड येथील इतवारा परिसरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह तर आत्ता पर्यंत कोरोनावर एकुण...

नांदेड येथील इतवारा परिसरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह तर आत्ता पर्यंत कोरोनावर एकुण १२९ व्यक्तींनी केली मात*

134
0

*नांदेड येथील इतवारा परिसरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह तर आत्ता पर्यंत कोरोनावर एकुण १२९ व्यक्तींनी केली मात*
*नांदेड, दि.६ ; राजेश एन भांगे*
कोरोना बाधितां मध्ये नांदेड येथील इतवारा परिसरातील 65 वर्षाचा एका पुरुष व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला असून सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 190 बाधित व्यक्तींपैकी 129 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर उर्वरित 53 बाधित व्यक्तींवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे.

जिल्ह्यात शनिवार 6 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 117 अहवालांपैकी 90 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 1 व मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथील 2 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उपचार घेत असलेले तीन बाधितांची प्रकृती गंभीर असून यात 52 व 65 वर्षांच्या दोन स्त्री तर 38 वर्षाचा एक पुरुष बाधित आहे.

आतापर्यंत एकूण 190 बाधितांपैकी 8 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 53 बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 10 बाधित व्यक्तींवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 40, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 तर माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर 1 बाधित व्यक्तीवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. शनिवार 6 जून रोजी 19 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 42 हजार 845, घेतलेले स्वॅब 4 हजार 380, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 884, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 1, एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती 190, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 172, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-78, मृत्यू संख्या- 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 129, रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती 53, स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 19 एवढी संख्या आहे.

जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Previous articleबीड जिल्ह्यात आज 2 खुनाच्या घटना, जिल्ह्यात क्राइममध्ये कमालीची वाढ
Next articleअमूल ट्विटर अकाउंट ब्लँक 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here