Home सामाजिक भर पावसात वृत्तपत्र विक्रेत्यांना सेवा सहयोग फाउंडेशन केले धान्यवाटप

भर पावसात वृत्तपत्र विक्रेत्यांना सेवा सहयोग फाउंडेशन केले धान्यवाटप

183
0

*🛑 भर पावसात वृत्तपत्र विक्रेत्यांना सेवा सहयोग फाउंडेशन केले धान्यवाटप*🛑
( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे -⭕वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. त्या चौथ्या स्तंभाचा शेवट भाग तर म्हणून वृत्तपत्र विक्रेता हा काम करत असतो. ऊन पाऊस वारा वादळ काही असो तो दररोज आपल्याला वृत्तपत्र घरपोच देत असतो. संपूर्ण जगावर जे कोरोना संकट आले आहे त्यामुळे २२ मार्च पासून घरोघरी वृत्तपत्रं वितरण बंद आहे.आणि या वृत्तपत्र विक्रेत्यांची रोजीरोटी पूर्णपणे बंद आहे.या विक्रेत्यांचे ग्राहकांकडे असलेले पेपर बिल सुद्धा त्यांना घेता न आल्याने या सर्व विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत सेवा सहयोग फाउंडेशन यांच्यावतीने ठाण्यातील गरजू ५५ वृत्तपत्र विक्रेत्यांना १५ किलो अन्नधान्य देण्यात आले. सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून व ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन यांच्या सहकार्याने भर पावसात ५५ वृत्तपत्र विक्रेत्यांना अन्नधान्य वाटप केल्यामुळे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी व संघटनेने या सेवा सहयोग फाउंडेशन चे संस्थापक श्री किशोर मोघे, श्री संजय हेगडे यांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर रिक्षा चालक, बिगारी कामगार, रंग मंच कामगार,शिलाईकाम करणाऱ्या महिला मिळून 166 किट वाटप केलेया प्रसंगी सेवा सहयोग च्या कार्यकर्त्या अंजली गांगल, आरती नेमाणे , संघटनेचे अध्यक्ष दत्ता घाडगे व विवेक इसामे, वैभव म्हात्रे, गणेश शेडगे व इतर सहकारी उपस्थित होते.

Previous articleवटपौर्णिमा निमित्त सर्व माता भगिनींना ⭕युवा मराठा न्युज तर्फे हार्दिक शुभेच्छा
Next articleआजपासून दुकाने, बाजारपेठाही खुल्या रिक्षा, टॅक्सी अत्यावश्यक कामांसाठी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here