Home राजकीय नेत्यांपाठोपाठ आता अभिनेताही राजभवनावर, या ‘हिरो’ने घेतली राज्यपालांची भेट

नेत्यांपाठोपाठ आता अभिनेताही राजभवनावर, या ‘हिरो’ने घेतली राज्यपालांची भेट

88
0

🛑 नेत्यांपाठोपाठ आता अभिनेताही राजभवनावर, या ‘हिरो’ने घेतली राज्यपालांची भेट🛑
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ गेल्या काही दिवसांपासून राजभवन हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनलं आहे. अनेक राजकारणी मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक वारंवार राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे नेतेमंडळी राज्यपालांना भेटायला जात असताना अभिनेता सोनू सूद हा देखील राजभवनावर गेला होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोनू सूदला राजभवनावर भेटायला बोलावलं होतं.

कोरोना लॉकडाऊनमध्ये परराज्यातल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवायला सोनू सूद मदत करत आहे. सोनू सूदच्या या मदतीचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही सोनू सूदने केलेलं हे काम आवडलं. राज्यपालांनी या कामाबद्दल सोनू सूदचं कौतुकही केलं आहे.

‘विविध राज्यातील स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात सुरक्षित पोहचविण्यासाठी सातत्यपूर्वक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले’, असं ट्विट राजभवनाने केलं आहे.

सोनू सूद याच्या या उपक्रमाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनीही काही दिवसांपूर्वीच सोनू सूदचं कौतुक केलं होतं. पडद्यावर सोनू सूद खलनायकाची भूमिका रंगवत असला, तरी खऱ्या आयुष्यात सोनू सूद नायक आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते.

 

 

 

 

 

Previous articleचाचण्या यशस्वी झाल्यास सप्टेंबरपर्यंत करोनावर लस
Next articleजेष्ठांनो काळजी करू नका कोरोना रोखण्यासाठी देणार “हे” औषध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here