Home कोरोना ब्रेकिंग कोरोनाबाधित ५२ हजार ६६७ ,आता पर्यंत १५ हजार ७८६ रुग्णांना घरी सोडले!

कोरोनाबाधित ५२ हजार ६६७ ,आता पर्यंत १५ हजार ७८६ रुग्णांना घरी सोडले!

125
0

⭕कोरोनाबाधित ५२ हजार ६६७ ,आता पर्यंत १५ हजार ७८६ रुग्णांना घरी सोडले!⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. सोमवारी २,४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले तर १,१८६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

बरे झालेल्या ११८५ रुग्णांपैकी सर्वाधिक ९०० रुग्ण मुंबई मंडळातील आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ५०१, ठाणे ३३७, पालघर १६, रायगड ४६, नाशिक ४, जळगाव ३, पुणे १०९, सोलापूर २, कोल्हापूर ३, सांगली ३, रत्नागिरी ९, औरंगाबाद ९४, जालना २, हिंगोली १, लातूर १०, उस्मानाबाद २, अकोला १७, अमरावती ४ आणि नागपूर २३ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
दिवसभरात राज्यात ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, एकूण संख्या १,६९५ झाली आहे. त्यामध्ये मुंबईमधील ३८, पुण्यात ११, नवी मुंबईत ३, ठाणे शहरात २, औरंगाबाद शहरात २, सोलापुरात १, कल्याण डोंबिवलीमध्ये १ तसेच रत्नाागिरीमधील एकाचा समावेश आहे. याशिवाय बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. या ६० मृतांपैकी ४७ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत; तर उर्वरित सहा मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ७८ हजार ५५५ नमुन्यांपैकी ५२ हजार ६६७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३० हजार २४७ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, ३५ हजार ४७९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Previous articleलाँकडाऊन संपल्यानंतर वीज बिलांचा लागणार शाँक! उन्हाळ्यातील वापर पावसाळ्यात फोडणार घाम !
Next articleसोने महागले ; तेजी मागील हे आहे कारण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here