Home महाराष्ट्र राज्य सरकार १५ जुन पासुन शाळा सुरू करण्याचा विचार

राज्य सरकार १५ जुन पासुन शाळा सुरू करण्याचा विचार

100
0
  • ⭕राज्य सरकार १५ जुन पासुन शाळा सुरू करण्याचा विचार⭕

    मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई – राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटा दरम्यान मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर शाळेच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या होत्या. पण आता राज्य सरकार १५ जूनपासून शाळा सुरु करण्याच्या विचारात असल्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातील ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. देशात सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरे ही रेड झोनमध्ये आहेत. पण टप्प्यात राज्यातील शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर शाळा दोन शिफ्टमध्ये सुरु करण्याचा विचार असल्याचेही संकेत वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

शाळा सुरु करताना दोन पर्यांयाचा सध्या विचार सुरु असून त्यानुसार पहिला पर्याय म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड आणि इव्हन नंबर प्रमाणे दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचे. तर दूसरा पर्याय म्हणजे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे दोन्ही गटांना एक दिवसाआड शाळेत बोलवायचे. आता राज्य सरकार या दोन पर्यायांचा विचार करत आहे. तसेच शाळा सुरु झाल्या तरीही एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांना घ्यायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Previous articleमालेगांवात ईदनिमित कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ईद घरीच साजरी करण्याचे आवाहन.
Next articleपोलिस कर्मचारी अडीच महिन्यांपासून झोपतोय जंगलात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here