Home बुलढाणा धनगर समाजाचा इशारा; दीपक बोहाडे यांचे उपोषण तात्काळ सोडवा – मुख्यमंत्री फडणवीस...

धनगर समाजाचा इशारा; दीपक बोहाडे यांचे उपोषण तात्काळ सोडवा – मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

119

आशाताई बच्छाव

1002013582.jpg

धनगर समाजाचा इशारा; दीपक बोहाडे यांचे उपोषण तात्काळ सोडवा – मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

✍🏻स्वप्निल देशमुख

संग्रामपूर (प्रतिनिधी):
धनगर समाज महासंघ व मल्हारसेना ता. संग्रामपूर जि. बुलढाणा यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. धनगर समाजाच्या घटनादत्त एस.टी. आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करून उपोषणकर्ते श्री. दीपक बोहाडे (जालना) यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडविण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

सन २०१४ मध्ये बारामती येथे लाखो धनगर समाज बांधवांसमोर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्ता मिळाल्यावर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू असा शब्द दिला होता. मात्र आजवर शेकडो कॅबिनेट बैठका पार पडूनही समाजाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

उपोषणकर्ते दीपक बोहाडे हे दिनांक १७ सप्टेंबरपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, अंबड चौफुल्ली, जालना येथे आमरण उपोषणावर बसले आहेत. आज उपोषणाचा १३ वा दिवस असूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाने तत्काळ ठोस निर्णय घ्यावा अन्यथा धनगर समाज बांधवांना तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

दीपक बोहाडे यांच्या उपोषणादरम्यान त्यांच्या जीवितास काही अनिष्ट घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारवर राहील, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर धनगर समाज महासंघ तालुका अध्यक्ष श्री. नंदकिशोर शिवराम पुढे, मल्हारसेना तालुका अध्यक्ष श्री. योगेश भिकाजी बाजोड व जिल्हा सचिव (डी.एस.एम.) श्री. अंबादास परसराम गवळे यांच्या सही आहे.

Previous articleनागपूर दीक्षाभूमीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात – रिपाईची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
Next articleनिफाड तालुक्यात सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.