Home वाशिम व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत...

व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार शेतकऱ्यांचे झाले हाल

49
0

आशाताई बच्छाव

1001595315.jpg

व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर
मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार

शेतकऱ्यांचे झाले हाल

वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ –जिल्यातील मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत आज दिनांक 12 जुन 2025 गुरुवार रोजी शेतकऱ्यानी विक्रीसाठी आणलेले सोयाबीन मार्केट कमीटीचे बांधून असलेले छ्तामध्ये व्यापाऱ्यांचे सोयाबीन टाकलेले असल्याने शेतकऱ्यांच्या साठी जागा नसल्याने उघडयावर सोयाबीन टाकावे लागले ,वजनकाटे चालु असतांना पावसाळयाचा पहीला पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या शेतमाल शेकडो क्विंटल पूर्णपणे ओला झाला असुन भिजला आहे .व्यापारांचा माल ओट्यावर सुरक्षीत आहे .नाणेटंचाई मुळे मंगरूळपीर बाजार समीती बंद होती .शेतकऱ्यांनी बी -बियाणे व खते , घेणेसाठी सोयाबीन आज रोजी विक्रीस आणले .तर व्यापा ऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर असा कृषी उत्पन्न बाजार समीती चा भेदभाव दिसुन आला . महाराष्ट्र राज्यातून कौतुकास पात्र ठरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रोजी शेतकऱ्यांचा ओला झालेल्या मालाला जबाबदार कोण ?सावरगांव येथील शेतकरी तेजस जनार्धन राऊत (पाटील) यांनी यापूर्वीच काल दिनांक 11 जुन2025 बुधवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समीतीला निवेदनात पावसाची नेसर्गीक आपत्तीची भिती व्यक्त करून अवगत केले होते. तरीही कृषी उत्पन्न बाजार समीतीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजची आपत्तीची वेळ शेतकऱ्यांवर आणली यासाठी जबाबदार असणांऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी तेजश राऊत यांनी केली .यापुढे शेतकऱ्यांच्या शेतमाल छ्ता खाली टाकावा नाही तर शेवटी देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या नशीबी हाल ?

Previous articleडिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
Next articleवाशिमच्या शेरी शिवारात विज कोसळून महिलेचा मृत्यू 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here