आशाताई बच्छाव
व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर
मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
शेतकऱ्यांचे झाले हाल
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ –जिल्यातील मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत आज दिनांक 12 जुन 2025 गुरुवार रोजी शेतकऱ्यानी विक्रीसाठी आणलेले सोयाबीन मार्केट कमीटीचे बांधून असलेले छ्तामध्ये व्यापाऱ्यांचे सोयाबीन टाकलेले असल्याने शेतकऱ्यांच्या साठी जागा नसल्याने उघडयावर सोयाबीन टाकावे लागले ,वजनकाटे चालु असतांना पावसाळयाचा पहीला पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या शेतमाल शेकडो क्विंटल पूर्णपणे ओला झाला असुन भिजला आहे .व्यापारांचा माल ओट्यावर सुरक्षीत आहे .नाणेटंचाई मुळे मंगरूळपीर बाजार समीती बंद होती .शेतकऱ्यांनी बी -बियाणे व खते , घेणेसाठी सोयाबीन आज रोजी विक्रीस आणले .तर व्यापा ऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर असा कृषी उत्पन्न बाजार समीती चा भेदभाव दिसुन आला . महाराष्ट्र राज्यातून कौतुकास पात्र ठरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रोजी शेतकऱ्यांचा ओला झालेल्या मालाला जबाबदार कोण ?सावरगांव येथील शेतकरी तेजस जनार्धन राऊत (पाटील) यांनी यापूर्वीच काल दिनांक 11 जुन2025 बुधवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समीतीला निवेदनात पावसाची नेसर्गीक आपत्तीची भिती व्यक्त करून अवगत केले होते. तरीही कृषी उत्पन्न बाजार समीतीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजची आपत्तीची वेळ शेतकऱ्यांवर आणली यासाठी जबाबदार असणांऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी तेजश राऊत यांनी केली .यापुढे शेतकऱ्यांच्या शेतमाल छ्ता खाली टाकावा नाही तर शेवटी देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या नशीबी हाल ?