Home जालना वरुड बु.गावामध्ये ट्रॅक्टर खाली आल्याने युवा शेतकऱ्यांचा मृत्यू

वरुड बु.गावामध्ये ट्रॅक्टर खाली आल्याने युवा शेतकऱ्यांचा मृत्यू

265

आशाताई बच्छाव

1001566625.jpg

वरुड बु.गावामध्ये ट्रॅक्टर खाली आल्याने युवा शेतकऱ्यांचा मृत्यू

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक गावामध्ये शेतात मशागत करताना रोटावेटर चालवताना ट्रॅक्टरच्या टायर खाली आल्याने तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता भोकरदन तालुक्यातील वरुड बुद्रुक या गावात घडली आहे.गोपीनाथ उत्तम वाघ वय 28 असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे गोपीनाथ यांच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते.पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने कधीही पाऊस पडून पेरणी सुरू होऊ शकते या भीतीने गोपीनाथ या नातेवाईकाचे ट्रॅक्टर आणून नांगरणी केली स्वतः रोटावेटर चालवायला सुरुवात केली रोटावेटर सुरू असताना अचानक तोल जाऊन टायर खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटना घडताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत ट्रॅक्टर बंद करून गोपीनाथ यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा मृत्यू झाला त्यांच्या पाश्चात आई एक भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे.

Previous article05 जून रोजी चे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचे आव्हान
Next articleकृषी संकल्प अभियानांतर्गत कृषि विभागाकडून खरीप हंगाम नियोजन व मार्गदर्शन कार्यक्रम म्हसरूळ येथे संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.