आशाताई बच्छाव
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त गडचिरोलीत भाजपा शहराच्या वतीने
निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष अनिल कुनधाळकर
प्रमुख मान्यवरांनी केला स्पर्धकांना मार्गदर्शन
गडचिरोली,सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधत भाजपा गडचिरोली शहराच्या वतीने एस.एम. अकॅडमी धानोरा रोड, इंदिरानगर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या निबंध स्पर्धेला बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनीने सहभाग घेतला.
परकीय आक्रमकांनी नष्ट केलेल्या भारतीय संस्कृतीच्या पुनर्निर्मानात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेले योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडलेला शौर्याचा आणि न्यायाचा विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पुढे नेण्याचे कार्य केले, म्हणूनच अहिल्यादेवी होळकर यांना लोकांनी ” पुण्यश्लोक” ही पदवी दिली अनिलजी कुनघाळकर यांनी म्हटले.
या निबंध स्पर्धेला प्रामुख्याने
माजी आमदार नामदेवजी उसेंडी साहेब किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा उपाध्यश भारतजी खटी, शहरअध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर, अकॅडमीचे संचालक मळावी सर तसेच माजी नगराध्यक्ष तथा शहर उपाध्यक्ष भूपेशभाऊ कुडमेथे शहर महामंत्री विनोदभाऊ देवोजवार, युवा मोर्चा चे निखिल गुंडमवार तसेच स्पर्धंक उपस्थित होते