Home नागपूर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी स्मारक समितीला दिली भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी स्मारक समितीला दिली भेट

221

आशाताई बच्छाव

1001369366.jpg

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी स्मारक समितीला दिली भेट

गौतम बुद्ध ला नमन व बाबासाहेबांना केले अभिवादन

भदंत सुरेई ससाई यांनी प्रधानमंत्री यांना बोधगया बुद्धांच्या स्वाधीन करा दिले निवेदन

संजीव भांबोरे
नागपूर_आज दिनांक 30 मार्च 2025 ला सकाळी 9.30 वाजता भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमी स्मारक समितीला भेट देऊन तथागताला नमन केले त्याचप्रमाणे बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत सुरेई ससाई यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शाल, श्रीफळ ,व पुष्पगुच्छ देऊन दीक्षाभूमी येथे सत्कार केला .त्याचप्रमाणे बोधगया येथे 12 एप्रिल पासून महाबोधी महाविहार आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा. बी. टी. अक्ट 1949 तात्काळ हटविण्यात यावा, बोधगया येथील ९ लोकांची कमिटी पूर्णता बरखास्त करून त्यामध्ये संपूर्ण बुद्धिस्ट घेण्यात यावे , दीक्षाभूमी जवळच असलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा सुद्धा दीक्षाभूमी स्मारक समितीला देण्यात यावी,या मागणीचे निवेदन सुद्धा भदंत
ससाई यांच्या हस्ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी, राजेंद्र गवई यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleदीक्षाभूमी येथे भेट दिल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोंदवहीत अभिप्राय नोंदविला.
Next articleकर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक; प्रहार संघटनेचे ११ एप्रिल ला राज्यभर आंदोलन,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.