Home बुलढाणा बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर...

बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर वसूल पात्र रकमाही काढल्या,

117

आशाताई बच्छाव

1001336506.jpg

बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर वसूल पात्र रकमाही काढल्या, अहवाल सादर करण्यासाठी एका महिन्याची मुदतही मागितली मात्र गटविकास अधिकाऱ्यांसह सविस्तर अधिकारीही रजेवर, पुन्हा सुरू होणार आता वरवंडला उपोषण…….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलडाणा बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथील ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून विकास कामाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केला आहे. यांच्या विरोधात कित्येक वर्षापासून तक्रारी चालू असून या तक्रारीवर अधिकाऱ्यांनी समिती नेमणूक केली होती त्या समितीने (स्पॉटवर) जागेवर जाऊन मोका पाहणी केल्यानंतर सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी अनेक प्रकारचे कामे केलेले असल्याचे दाखविले होते मात्र त्या ठिकाणी ते दिसून न आल्यामुळे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर वसूल पात्र रकमा काढण्यात आलेल्या होत्या.

या वसूल पात्र रकमा आद्यपही शासनाच्या खात्यात जमा न केल्यामुळे आता जिल्हा परिषदेला येथे लेखी स्वरुपात मध्ये निवेदन देण्यात आले होते या निवेदनात मध्ये असे म्हटले होते की आम्ही वरवंड येथील कायम रहिवाशी असून कायद्याचे तंतोतंत पालन करणारे नागरिक आहोत. गावाचा विकास व्हावा, गावातील नागरिकांना सोयी, सुविधा मिळाव्यात याकरिता शासनाकडून लाखो रुपयाचा निधी विविध घटकाअंतर्गत पुरविल्या जातो. अशातच ग्राम पंचायत वरवंड यांना शासनाच्या निधीतून १४ वा वित्त आयोगामधून लाखो रुपयाचा निधी प्राप्त झाला होता, मात्र तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने अफरातफर करुन मोठ्या प्रमाणात अनियमितता करुन भ्रष्टाचार केला आहे. याबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा केल्याने शासनाकडून वसूल पात्र रक्कम सुध्दा संबंधीतांकडून वसुल करण्यात यावी,याबाबत समितीव्दारे अहवाल सुध्दा देण्यात आला. मात्र अद्यापपावेतो वसुलपात्र रक्कम संबंधीतांकडून वसूल करण्यात आली नाही व शासनखाती सुध्दा जमा करण्यात आली नाही.

संबंधीत प्रकरणी आपले स्तरावरुन सखोल चौकशी होवून सदरहू वसूल पात्र रक्कम शासन खाती जमा करणेबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी व संबंधीतांवर कडक कार्यवाही करण्यात यावी. सदरहू प्रकरणाची ०७ दिवसाचे आत दखल घेण्यात यावी. अन्यथा दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी आपले कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता यावर पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी पवार मॅडम व विस्तार अधिकारी गवते यांनी सविस्तर मीटिंग घेऊन या मीटिंगमध्ये ग्रामसेवक आर के बोबडे तत्कालीन सरपंच व तक्रार करते अशोक भास्कर चावरे व प्रकाश जेऊघाले यांच्या समक्ष एका महिन्याची मुदत मागण्यात आली होती ही मुदत संपून आता दोन महिने झाली असून पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे महिन्यापासून रजा टाकून बसले आहेत कोणत्या कारणामुळे रजेवर आहे याची माहिती सुद्धा पंचायत समिती इथून मिळत नाही. विचारपूस केल्यानंतर गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे कामावर रुजू झाल्यानंतर तुमच्या तक्रारीचे निवारण करू अशी उत्तरे देतात पण शासनाचा निधीचा भ्रष्टाचार झाला याचं काय? गेल्या पाच वर्षात पासून वारंवार गटविकास
अधिकारी सुट्टीवर जातात तर कधी विस्तार अधिकारी जातात या प्रकरणांमध्ये आतापर्यंत तीन गट विकास अधिकारी व तीन विस्ताराधिकारी बदलून गेलेले आहेत मात्र या प्रकरणाचा आद्यपहिनिकाल आतापर्यंत लागलेला नाही त्यामुळे आता तक्रारकर्त्यांवर वरवंड येथील ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्याची वेळ आली आहे येत्या सोमवार पर्यंत जर गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी अहवाल सादर करावा व या अहवालामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी न केल्यास येणाऱ्या काही दिवसातच वरवंड येथील हनुमान मंदिराच्या समोर उपोषणाला सुरुवात करण्याचा इशारा देण्यात येणार आहे.

Previous articleमर्डर..! मोताळा तालुक्यातील लालमाती फाट्यावर खून; आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात जाऊन म्हणाला…
Next articleअवघ्या २१ वर्षाच्या मुलांने राहत्या घरातच केली आत्महत्या, निमगाव गावावर शोककळा…..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.