Home जालना जालना-छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याच्या आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय...

जालना-छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याच्या आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन.

28
0

आशाताई बच्छाव

1001233779.jpg

जालना-छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याच्या आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन.
छत्रपती संभाजीनगर / जालना, 13 फेब्रुवारी 2025 – जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.कल्याण वैजिनाथराव काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जालना-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)-अहिल्यानगर (अहमदनगर) या महत्त्वाच्या महामार्गाच्या आठ पदरी विस्तारीकरणासाठी व सदर रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यासाठी निवेदन दिले.
या पत्रात खासदार काळे यांनी या मार्गाचे व्यापारी आणि वाहतूकदृष्ट्या महत्त्व अधोरेखित करत, सद्यस्थितीत या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने रस्ता अपघातांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आणून दिले. या आठ-लेन महामार्गाच्या विकासामुळे वाहतूक सुरळीत होईल, अपघातांची संख्या कमी होईल, तसेच व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
या आठ-लेन महामार्गामुळे होणारे महत्त्वाचे फायदे –
1. वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.
2. रस्ते सुरक्षेत वाढ होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल.
3. प्रवासी आणि वाहतूक सेवांची गती वाढेल.
4. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
5. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि संपर्क सुधारेल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

Previous articleपालक सचिव पराग जैन यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा
Next articleतुमसरमध्ये सट्टापट्टी अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here