Home बुलढाणा दुर्दैवी ! नवीन वर्षात नियतीने डाव साधला ! – जालना येथील अपघातात...

दुर्दैवी ! नवीन वर्षात नियतीने डाव साधला ! – जालना येथील अपघातात बुलढाण्याचे चार ठार !

112

आशाताई बच्छाव

1001110301.jpg

दुर्दैवी ! नवीन वर्षात नियतीने डाव साधला ! – जालना येथील अपघातात बुलढाण्याचे चार ठार !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा नवीन वर्षाची सुरुवात अपघाताने होत आहे की काय? या विचारानेच उरात धडकी भरत आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात झाला आहे. जालन्यातील अपघातात
बुलढाण्याचे चौघे ठार झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतेय. रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला कारची मागून धडक लागल्याने मोठा अपघात झाला.या अपघातात जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील चौघे ठार झालेत. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळ शिवारात ही घटना घडली.
अपघातातील मृत्यू झालेल्या व्यक्तीसह मुलगा मुलगी आणि चुलत बहीण हे पंढरपूर कोल्हापूर तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन केले आणि परत निघताना, नियतीने डाव साधला. यामध्ये भागवत यशवंत चौरे, सृष्टी भागवत चौरे, वेदांत चौरे (अंबड जिल्हा जालना), अनिता परसराम कुटे (संभाजीनगर) असे मृतकांची नाव आहे.

Previous articleडोणगाव युवकांची अनोखी मानवताः बेशुद्ध गाईला दिले जीवनदान ! गौमातेसाठी एकजुट तरुणांचे कौतुकास्पद कार्य !
Next articleवसमत शहरात वानरानी मानव वस्तीत येऊन दिले माणूसकीचे दर्शन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.