आशाताई बच्छाव
31 डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांवर कार्यवाही करावी सह्याद्री प्रतिष्ठानचे पोलीस निरीक्षकांना निवेदन.
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवर संवर्धन कार्य करत असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत
या गडकिल्ल्यांवर दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी काही ठराविक पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणारे लोक दारू मटणाच्या पार्ट्यांचे आयोजन करून त्या ठिकाणी धिंगाणा घालण्याचे काम करीत असतात यामुळे गड किल्ल्यांचे पावित्र्य भंग होते
चाळीसगाव तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या किल्ले राजदेहरे, किल्ले कन्हेरगड, किल्ले मल्हारगड, या ठिकाणी किल्ल्यांच्या पायथ्याला दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी पोलीस गस्त ठेवावी तसेच या ठिकाणी दारू मटणाच्या पार्ट्या करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, तालुकाप्रमुख गणेश पप्पू पाटील, बाळासाहेब सोनवणे, जयवंत शेलार, ललित अशोक चौधरी, दर्शन चौधरी, पैलवान सचिन पाटील, बबलू चव्हाण, मयूर भागवत, संजय ठाकूर, संजय पवार, मुकुल भागवत, नृतेश भागवत, धनंजय कुलथे
आदी उपस्थित होते.






