आशाताई बच्छाव
साखरपुड्याला गेले अन लग्न लावून आले…
दरेगाव चे सरपंच गिरीष पाटील यांनी घेतला पुढाकार…
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- लग्न समारंभ आला म्हणजे मुलगी बघणे त्यानंतर पाहुण्यांची वर्दळ, अफाट खर्च मग त्यानंतर साखरपुडा, लग्न पत्रिका छापून वाटप करणे या गोष्टीत वेळ व पैसा खर्च होतो मात्र दरेगाव ता चाळीसगाव येथील सरपंच गिरीष सर्जेराव पाटील यांनी त्यांचे नातेवाईक यांच्या साखरपुडा कार्यक्रम साठी गेले असता मुलीकडील लोकांना थेट साखरपुड्यातच लग्न करा असा प्रस्ताव मांडला असता दोन्ही कडील लोकांना ते मान्य झाले आणि साखर पुड्यातच लग्न सोहळा संपन्न झाला.
दत्तात्रेय निवृत्ती कडलक राहणार दरेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचे ज्येष्ठ चिरंजीव उमेश आणि
चिकलठाण तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद अनिता व अरुण पतंगराव चव्हाण यांची सुकन्या देवयानी यांचा साखरपुडा कार्यक्रम ठरलेला असल्याने ठराविक नातेवाईक मंडळी व दरेगाव चे सरपंच गिरीष पाटील हे चिकलठाण येथे गेले होते सरपंच गिरीष पाटील यांनी साखरपुड्यामध्ये विवाह उरकून घ्या असा प्रस्ताव ठेवल्यावर सर्वांनी मान्य करून त्याच दिवशी विवाह संपन्न झाला.
यामुळे परिसरात हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरून वधू व वरा कडील मंडळींचे कौतुक होत आहे.
यावेळी मुलीचे काका रामकिसन चव्हाण, कुसुम राम किसन चव्हाण, मुलाचे मामा प्रवीण आबासाहेब मोरे, मामी एडवोकेट स्मिता प्रवीण मोरे, सूर्यकांत मोरे, ज्योती मोरे, बाबा आबासाहेब यादवराव मोरे, मुलाचे काका उत्तमराव कडलक, नानासाहेब कडलक, रोहिणी कडलक, राजेंद्र वाघ, महाले सर, साळुंके बाबा, दिनेश मोरे, यशवंत आबाजी फोपसे, विकास चव्हाण, राजश्री चव्हाण, वैशाली फोपसे, अभिजीत फोपसे, वर्षा फोपसे आदी वऱ्हाडी उपस्थित होते.






