आशाताई बच्छाव
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा – गोरंटयाल
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाच्या मृत्त्यू प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मा.आमदार कैलास गोरंटयाल यांनी आज शनिवारी येथे बोलतांना केली आहे. परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा झालेला मृत्यू आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेचा निषेधार्थ आंबेडकरी संघटनांच्या वतीने आज शनिवारी जालना शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते.यावेळी शांतता रॅलीत सहभागी होत माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी उपरोक्त मागणी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना केवळ निलंबित करून चालणार नाही तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा तसेच मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी करत जालना बंदला प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी व्यापारी बांधवांचे आभार मानले.