Home बीड अँड.मनोज संकाये यांच्या मागणीला यश; नगरपालिकेकडून ट्रान्सपोर्ट रोडचे काम प्रगतीपथावर

अँड.मनोज संकाये यांच्या मागणीला यश; नगरपालिकेकडून ट्रान्सपोर्ट रोडचे काम प्रगतीपथावर

137

आशाताई बच्छाव

1001044239.jpg

अँड.मनोज संकाये यांच्या मागणीला यश; नगरपालिकेकडून ट्रान्सपोर्ट रोडचे काम प्रगतीपथावर

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

परळी दि. १३ डिसेंबर २०२४
गेल्या अनेक वर्षांपासून परळीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला रेल्वे उड्डाणपुलाखाली ट्रान्सपोर्ट रोडचे काम नगरपालिकेकडून प्रगतीपथावर चालू आहे याची पाहणी आज त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवाजीनगर येथील रहिवाशी रिपाईचे ज्येष्ठ नेते भीमराव पौळे, ॲड. दीपक शिंदे उपस्थित होते.
ट्रान्सपोर्ट रोडचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते. या मागणीसाठी त्यांनी अनेक वेळा नगरपालिका प्रशासन, तहसील प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली आणि मागणी पूर्ण करण्यासाठी सतत पाठपुरावा केला. नगरपालिका प्रशासनाने या कामाची दखल घेतली गेल्या दहा दिवसापासून काम सुरू आहे. रोडवर खडी अंथरण्याचे काम सुरू आहे आणि इतर काम लवकर पूर्ण होणार आहे त्यामुळे शिवाजीनगर आणि येथील परिसरातील राहणाऱ्या लोकांचा प्रदूषणाचा त्रास कमी होण्यास मदत होईल. परिसरातील नागरिकांना प्रदूषणामुळे श्वसनाचे, त्वचेचे विकार जडत होते आणि पर्यायाने नागरिकांच्या खिशाला कात्री लागत होती. त्यांनी नगरपालिका प्रशासनाचे काम सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत तसेच नागरिकांनी त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे व मागणीला यश आल्यामुळे त्यांचे आभार मानले आहेत.

Previous articleव्हाईस ऑफ मीडियाची देगलूर कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी प्रा.निवृत्ती भागवत,तर सचिवपदी शब्बीर शेख
Next articleमहाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.