Home जालना भाजप साठी जालना विधानसभेची जागा मिळणेसाठी प्रयत्न करणार

भाजप साठी जालना विधानसभेची जागा मिळणेसाठी प्रयत्न करणार

16
0

आशाताई बच्छाव

1000819138.jpg

 

भाजप साठी जालना विधानसभेची जागा मिळणेसाठी प्रयत्न करणार

जालना विधानसभा भाजपा बहुमताने जिंकणार

-माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) जालना विधानसभेची जागा भाजपकडे मिळण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांच्या व पदाधिकारी यांच्या भावना लक्षात घेऊन प्रदेश भाजपाकडे प्रयत्न करणार असून जालना विधानसभेची जागा भाजप बहुमताने जिंकणार असल्याचे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भाजपा महा कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना जालना येथे व्यक्त केले.

जालना येथे भाजपाचा महा कार्यकर्ता मेळावा व सदस्यता नोंदणी अभियान हॉटेल गॅलेक्सी येथील गोकुळ लॉन्स येथे संपन्न झाला यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे पदाधिकार यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जालना विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे त्यामुळे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठीवरच जालना विधानसभा भाजपा लढविल्यास भाजपा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. जालना शहरासाठी व ग्रामीण साठी अनेक विकासाचे योजना राबविल्या व 200 कोटी रुपयांचे जालना रेल्वे स्टेशन व 300 कोटी रुपयांचे छत्रपती संभाजीनगरचे रेल्वे स्टेशनचे काम चालू आहे.

माजी मंत्री असताना जालना लोकसभा मतदारसंघात 600 कोटी रुपयांचे सिमेंट रस्त्याचे कामे केली असून अनेक विकास प्रकल्प जालना शहरात मंजूर केले आहे केंद्र व राज्य शासनाकडून एका कुटुंबाला पीएम,सीएम किसान योजनेचे वार्षिक 12 हजार रुपये, महिलांना वार्षिक लाडकी बहीण योजनेचे 18 हजार रुपये, असे ३० हजार रुपये वर्षाला एका कुटुंबाला केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान मिळत आहे.

Previous articleजनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला ; आ. कैलास गोरंट्याल
Next articleअंबड येथे आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षण व शेतकरी  संघर्ष यात्रा निमित्त मेळावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here