Home गडचिरोली आपल्या समाजामध्ये राजकीय जागरूकता असणे महत्त्वाचे आहे.- डॉ मिलिंद नरोटे

आपल्या समाजामध्ये राजकीय जागरूकता असणे महत्त्वाचे आहे.- डॉ मिलिंद नरोटे

14
0

आशाताई बच्छाव

1000816222.jpg

आपल्या समाजामध्ये राजकीय जागरूकता असणे महत्त्वाचे आहे.- डॉ मिलिंद नरोटे                            गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

अभिनव लॉन गडचिरोली

विरंगणा राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त अभिनव लॉन गडचिरोली येथे समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात समाजातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी आदिवासी मोर्चा चे डॉक्टर मिलिंद नरोटे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते

समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर आपल्याला वेळेनुसार आपल्यात बदल घडवणे आवश्यक आहे. आपल्या समाजात मागासलेला नसून अनेक उच्चशिक्षित तथा अधिकारी वर्ग आपल्या समाजात आहे त्यांच्या मार्गदर्शनात आपण एकजुटीने समोर जाणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी केले
यावेळी प्रामुख्याने माजी आमदार हे हरीरामजी वरखडे, जेष्ठ समाज सुधारक देवाजी तोफा, माजी आमदार नामदेव उसेंडी, अध्यक्ष जिल्हा कामगार सोसायटी पुर्णचंद्रराव रायसिडाम, माजी आमदार हिरामण वरखडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रताई कोडवते, सिनेट सदस्य डॉ. प्रा. नरेश मडावी, लालाजी ऊसेंडी चरणदास पेंदाम, ॲड.दिलीप मडावी, अर्चनाताई मडावी व समाज बांधव उपस्थित होते

Previous articleगडचिरोली जिल्ह्यात राजकीय नेतृत्व निर्माण होऊ नये म्हणून आपला विरोध
Next articleमहिलांना उद्योजक बनवून आर्थिक सक्षम करणे हे आपले स्वप्न आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here