आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांनी पेरणीनंतर व काढणीनंतरही सोयाबीनला आलेले मोड पासुन डोळ्यात अश्रू आले.
हिंगोली जिल्ह्यातील सततच्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्याला काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसत आहे.
ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने व सप्टेंबर महिन्यातील सुरुवातीला झालेल्या पावसाने शेतकऱ्याचे पिकाचे मोठे नुकसान या अगोदरच झाले आहे त्यानंतर अद्याप काही भागात नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे पुरते झालेले नाहीत तर पंचनामे होऊन एक महिना उलटायला आला तरी शेतकऱ्याला पीक नुकसानीच्या संदर्भात शासनाने जाहीर केलेल्या नुकसानीचे आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही राहिलेल्या पिकाची कहाणीला सुरुवात होतात परत परतीच्या पावसाने पार कंबरडेच मोडले गेल्या सहा दिवसापासून जिल्हाभरात प्रत्येक दिवशी पावसाने थैमान घातले आहे या परतीच्या पावसाने काढून टाकलेले सोयाबीनला पेरणीनंतर आलेले मोड व काढणीनंतर आलेले मोड सारखे दिसू लागल्याने शेतात जायला सुद्धा शेतकऱ्याची हिंमत होत नसल्याची आज घडीला पाहायला मिळत आहे शेतातील मोड पाहून सोयाबीनचे त्याच पद्धतीचे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा टपटपलेले पाहायला मिळत आहेत पेरणीसाठी काढलेली कर्ज त्यानंतर औषधी व खत यासाठी लागलेला खर्च निमणी खुरपणी कुळवणी अशा पिकाच्या वेळोवेळीच्या अंतर मशागत साठी मोठा खर्च झालेला आहे पण निसर्गाच्या समोर सर्वांनाच झुकावे लागते तशीच कथा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समोर पाहायला मिळत आहे पित्त गेले पण पिक विमा नाही व नुकसान भरपाई नाही उदास सरकारला शेतकऱ्याची दया येईल का असा टाऊ फोडून शेतकऱ्याचा आक्रोश हिंगोली जिल्ह्यातील पाहायला मिळत आहे .
हिंगोली.श्रीहरी आंबोरे पाटील .