Home जालना गाडगेबाबा घानेवाडी जलाशयाच्या समृद्धीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार – खा. डॉ. कल्याण काळे

गाडगेबाबा घानेवाडी जलाशयाच्या समृद्धीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार – खा. डॉ. कल्याण काळे

108

आशाताई बच्छाव

1000760917.jpg

गाडगेबाबा घानेवाडी जलाशयाच्या समृद्धीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार – खा. डॉ. कल्याण काळे
जालना (प्रतिनीधी दिलीप बोंडे) राष्ट्रसंत                       गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाच्या समृद्धीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार डाॅ.कल्याण काळे यांनी दिले. घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा  जलाशयाला सोमवार दि.१६ रोजी त्यांनी भेट दिली. तलावाची पहाणी करून या तलावाच्या विकासासह विविध समस्या समजून घेतल्या. यावेळी शिरपूर पॅटर्नचे जनक जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर, घाणेवाडी जलसंरक्षण मंचाचे अध्यक्ष भाईश्री रमेशभाई पटेल,  जयप्रकाश चव्हाण, उद्योजक सुनील रायठठ्ठा, उदय शिंदे,ओमप्रकाश चितळकर उपस्थित होते.                              स्वातंत्र्यपूर्व काळापासून जालना शहरासह परिसरातील बावीस गावे आणि शेतीला पाणी पुरवणारा तलाव ही आपली ऐतिहासिक धरोहर आहे. आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची ही निषाणी आहे.याचे शास्त्रशुद्ध पध्दतीनुसार जतन आणि संवर्धन करण्याचे काम लोकसहभागातून घाणेवाडी जलसंवर्धन मंचाच्या नेतृत्वाखाली चालते. हा आदर्श संपूर्ण राज्यभरात घेण्याची गरज असल्याचे खा.डाॅ.काळे यावेळी बोलतांना म्हणाले.             घाणेवाडी तलावाचे दोन्ही सांडवे तात्काळ दुरूस्त करून तलावाच्या भिंतीवरील पिचींग दुरूस्त करण्याची गरज असल्याचे भाईश्री रमेशभाई पटेल यांनी सांगितले.    लोकसहभागातून यंदाच्या वर्षांत पाच लाख ट्रॅक्टर गाळ काढून परिसरातील शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहीती उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी यावेळेस दिली घाणेवाडीतील गाळ काढून कुंडलिका नदीपात्रात मोठ्या विहिरीतून पाणी उपलब्ध झाल्यास जायकवाडी धरणातून अतिशय अल्प प्रमाणात पाणी घेण्याची जालना शहराला गरज असेल असे जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांनी सांगितले.

Previous articleसतीश घाटगेंकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातली घोषणा !
Next articleमहात्मा फुले विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.