आशाताई बच्छाव
१५ वर्षापासून प्रलंबित असलेले शेतरस्ते ‘समृद्धी’ने केले दुरुस्त
स्वखर्चातून रस्ते तयार केल्याने शेतकऱ्यांनी मानले सतीश घाटगेंचे आभार
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): गेल्या पंधरा वर्षापासून शेकडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला अंबड तालुक्यातील धाकलगाव ते नावडे वस्ती व घनसावंगी तालुक्यातील हरसिंग नाईक तांडा ते राणी उंचेगाव हा शेत रस्ता नादुरुस्त होता. वारंवार हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी शेतकरी करत होते. परंतु त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. पाच वेळा स्थानिक आमदाराने या रस्त्यावर नारळ फोडले पण काम काही केले अन्ही. शेवटी समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी स्वखर्चातून हे दोन्ही रस्ते शुक्रवारी तयार करायला सुरुवात केली. यामुळे दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले..
घनसावंगी तालुक्यातील हरसिंग नाईक तांडा ते राणी उंचेगाव हा रस्ता नादुरुस्त असल्याने येथील शाळकरी मुलांना शाळेत जाता येत नव्हते. तसेच शेतकऱ्यांना शेतात जाणे जिकरीचे बनले होते. अशीच स्थिती धाकलगाव ते नावडे वस्ती या रस्त्यामुळे दाखल गाव येथील शेतकऱ्यांची होती या दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी सतीश घाडगे यांची भेट घेऊन हे रस्ते दुरुस्त करून देण्याची मागणी दोन दिवसापूर्वी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेऊन सतीश घाटगे यांनी या दोन्ही रस्त्याचे काम स्वखर्चातून सुरू केले अगोदर काम सुरू करून नंतर या रस्त्याचे उद्घाटन त्यांनी केले. यावेळी दोन्ही गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षापासूनची मागणी दोन दिवसात पूर्ण केल्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झाले. त्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले.