आशाताई बच्छाव
बीड जिल्ह्याच्या कायद्यात राजकारण का? राजकारणात कायदा सुचेना!
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड दि:२७- बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून सध्या बीड जिल्ह्यातीलच नव्हेत तर महाराष्ट्रातील सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ज्या घटना घडत आहेत त्याला जबाबदार कोण? महाराष्ट्रातील राजकारण, राजकीय पक्ष आणि महाराष्ट्रातील वाढत चाललेले गुन्हेगारीचे प्रमाण व गुन्हा करून मोकाट फिरणारे गुन्हेगार याला जबाबदार आहे. शासनातील कायद्यात काम करणारे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय पक्षातील राजकीय नेते, पुढारी आणि गुंड भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी, भ्रष्ट नेते पुढारी आणि गुंड या तिन्ही क्षेत्रातील लोकांची सांगड आणि एकमत झाल्याने आज महाराष्ट्रात अराजकता माजली असून नेमक कायद्यात राजकारण आहे का ? राजकारणात कायदा हाच सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. पुर्वीच्या काळी महाराष्ट्र शासनाचा, पोलिस खात्याचा जो दरारा दिसत होता तो आज दिसत नाही. महाराष्ट्रातील झाडू मारणाऱ्या चपराश्यापासून ते कलेक्टर पर्यंत सर्व अधिकारी आणि कर्मचारी भ्रष्ट असल्याचे अनेक घटनांमधून आणि पुराव्यावरून सिद्ध झाले आहे. शासन आणि प्रशासन हे सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे असले पाहिजे पोलिस प्रशासन म्हणजे सामान्य जनतेचा विश्वास आणि ताकत देशातील कायदा आणि सुव्यवस्थ राखण्यासाठी आहे परंतू आज याच पोलिस प्रशासनाकडून मोठे मोठे गुन्हे होताना दिसतात. सामान्य जनतेला वेठिस धरून राजकीय पक्षातील भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांची हुजूरी करताना महाराष्ट्र शासन आणि पोलिस खाते करत असताना दिसतात. मोठ मोठ्या गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना राजकीय पक्षातील नेत्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या एका फोनवर कोणताही गुन्हा दाखल न करता मोकाट सोडून दिले जाते. तसेच महाराष्ट्र शासनातील अधिकारी आणि कर्मचारी सामान्य जनतेला वेठीस धरून मोठ मोठ्या राजकीय नेत्यांची कामे करतात. अशा कित्येक घटना आहेत. पोलिस प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी, राजकारणातील भ्रष्ट, गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांमुळे आणि महाराष्ट्र शासनातील भ्रष्ट शासकिय कर्मचारी यांच्या सांगडीने मोठ्यात मोठ्या गुन्हे करणाऱ्यांना पाठबळ मिळते. यामुळेच आज महाराष्ट्रातील जनतेची आणि महाराष्ट्राची अशी दुर्दशा झालेली दिसते. पोलिस खात्यातील खाकी दरारा आज भ्रष्ट राजकारण्यांची आणि गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांची गुलामगिरी आणि हुजुरेगिरी करताना दिसत आहे. महाराष्ट्रातील खाकी वर्दीतला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जेव्हा खादीतील भ्रष्ट आणि गुंड प्रवृत्तीच्या राजकीय नेत्यांना खाकीचा हिसका दाखवणार का? असा सवाल आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता करत आहे.