आशाताई बच्छाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने मस्तगड येथे मनुस्मृतीचे दहन; सरकार विरोधात जोदार घोषणाबाजी जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)
जालना शहरातील मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शेषराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 वाजता मनुस्मृतीचे दहन करुन आंदोलन करण्यात आलं.
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन करून देशातील सर्व जातींच्या महिलांना सन्मानाने जगण्याचा व समानतेचा हक्क मिळवून दिला. परंतु, शिंदे सरकारने मनुष्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने त्याला विरोध करण्यासाठी मनुस्मृतीचे दहन करुन आंदोलन करण्यात आलं असल्याचं शेषराव जाधव यांनी म्हटलंय. यावेळी कुणाल दादा राऊत मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव, भाऊसाहेब वारे, सुभाष नरोडे, मदन वाघ, किशोर गायकवाड, भालेराव, विकी आठवले, आकाश हिवाळे, विकास कारगे, प्रभु दाभाडे, प्रभु लोखंडे यांची उपस्थिीती होती. दरम्यान मनुस्मृतीचे दहन करुन सरकार विरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली. काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मनुस्मृती दहनाचे आंदोलन करण्यात येत असून त्याच प्रकारे जालना येथे देखील आंदोलन करण्यात आलं. असेही शेषराव जाधव यांनी यावेळी सांगितले.