आशाताई बच्छाव
आपल्यावर होणारा अन्याय-त्रास तुम्ही अजिबात सहन करू नका- जिल्हाप्रमुख
भास्करराव अंबेकर
शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत भयमुक्त विद्यार्थिनी उपक्रम
संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्या पुढाकाराने उपक्रमाचे आयोजन
जालना, दि. २६(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)- शहरातील संभाजीनगर प्रभागात असलेल्या
शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेत संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या पुढाकाराने भयमुक्त विद्यार्थिनी
या उपक्रमाचे आयोजन देशात व राज्यात सद्यस्थितीत घडणार्या घटनांच्या
पार्श्वभूमीवर सोमवार रोजी करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजीसभापती देवनाथ जाधव, शहरप्रमुख बाला परदेशी,
घनश्याम खाकिवाले, दुर्गेश काठोटीवाले, सोनाजी पाटील यांची उपस्थिती
होती. या उपक्रमांतर्गत जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस
निरीक्षक संदीप भारती यांनी शाळेत येऊन विद्यार्थिनींशी मनमोकळेपणाने
संवाद साधला. यावेळी उपस्थित मुलींना मार्गदर्शन करताना भारती म्हणाले
की, कोणत्याही परिस्थितीत मुलींनी घाबरून जाऊ नये. गुंडप्रवृत्तीच्या व
त्रास देणार्या लोकांचा प्रतिकार केला पाहिजे. तसेच आपणास दिलेल्या टोल
प्रâी नंबरवर संपर्क केल्यास ताबडतोब तुम्हाला मदत मिळेल. समाजातील सर्वच
घटक हे वाईट नाही तर अनेक नागरिक चांगले असतात अनेक प्रसंगी ते आपणास मदत
करतात. विद्यार्थिनींना अत्यंत मनमोकळेपणे बोलण्यास भाग पाडून त्यांनी
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना दिली व
त्यांच्या मनात पोलीस विभागाविषयी विश्वास निर्माण केला.
उपक्रमाचे प्रास्ताविक करताना अध्यक्ष भास्कर आंबेकर म्हणाले की, शहरातील
अनेक मुलींचा शाळा महाविद्यालये सुटल्यावर उपद्रवी व गुंड प्रवृत्तीच्या
लोकांकडून छेडछाड व पाठलाग करतात.