आशाताई बच्छाव
गिरणा – मोसम नद्यांना पुर
दुथडी भरून वाहत असल्याने
नागरिक व शेतकरी सुखावला
(श्रीमती आशाताई बच्छाव)
मालेगाव,दि.२६:- गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सटाणा तालुक्यातील हरणबारी धरण पुर्णपणे भरल्याने मोसम नदीला पुर आला आहे.तर कळवण तालुक्यातील पश्चिम भागातही सतत पावसाची संततधार सुरू असल्याने गिरणा नदीला सुध्दा मोठा पुर आला आहे.दरम्यान सोयगाव ते टेहरे दरम्यान एकलव्य पुल पाण्याखाली आला असून,नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.तर मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सटाणा व कळवण तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यातील पाऊसमुळे गिरणा व मोसम काठावरील शेतकरी सुखावला आहे.शिवाय पिण्याचा पाणी प्रश्न काही अंशी मार्गी लागेल असे जाणकारांनी “युवा मराठा न्यूज”शी बोलताना सांगितले.मोसम गिरणा नद्यांना आलेल्या पुर पाण्याची परिस्थिती पाहण्यासाठी लहान मुलाबाळांसह आबालवृद्धांची गर्दी दिसून आली.