Home जालना १५ वर्षात न सुटलेला रस्त्याचा प्रश्न दोन दिवसात मार्गी 

१५ वर्षात न सुटलेला रस्त्याचा प्रश्न दोन दिवसात मार्गी 

44
0

आशाताई बच्छाव

1000675384.jpg

१५ वर्षात न सुटलेला रस्त्याचा प्रश्न दोन दिवसात मार्गी
घाटगे पाटलांनी स्वखर्चातून तयार केला  निपाणी पिंपळगावच्या शेतरस्ता  
———
घनसावंगी/जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ):  तालुक्यातील  निपाणी पिंपळगाव येथील शेतकरी १५ वर्षांपासून शेत रस्त्याअभावी त्रस्त होते.  दोन दिवसापूर्वी त्यांनी सतीश घाटगे यांची भेटू घेऊन आपला प्रश्न मांडला.  या शेतकऱ्यांचा प्रश्न दोन दिवसात घाटगे पाटलांनी मार्गी लावला असून समृद्धी कारखान्यांमार्फत स्वखर्चातून हा रस्ता तयार करून दिला आहे.

निपाणी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांना  अरुंद रस्त्याअभावी शेती करता येत नव्हती.  हा रस्ता झाल्यास आमची जीवनवहिनी सुरू होईल, अशी माफक अपेक्षा त्यांनी  सतीश घाटगे यांच्याकडे व्यक्त  केली होती.   15 वर्षात होऊ न शकलेले हे काम दोन दिवसात घाटगे पाटील यांनी मार्गी लावले.  त्यामुळे शेतकरी आनंदी झाले. त्यांनी आनंद व्यक्त करत सतीश  घाटगे यांचे आभार मानले. समृद्धी कारखाण्यामार्फत स्वखर्चातून  तयार झालेला हा रस्ता भविष्यात खडीकरण करून मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले.   या रस्त्यासाठी स्थानिक कार्यकर्ते भाऊसाहेब ढेंबरे आणि माऊली ढेंबरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.  यावेळी विठ्ठल गोल्ड,रावसाहेब बिरणावळे,अर्जुन बिरणावळे,भाऊसाहेब बिरणावळे,अशोक बिरनावळे,आकाश बिरणावळे, सुदाम बिरणावळे,सचिन बिरणावळे,अमोल गव्हाणे,नामदेव गव्हाणे उपस्थित होते

Previous articleबदलापूर घटनेच्या निषेधार्थ जालन्यात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन
Next articleतुमसर येथे महाविकास आघाडीचे काळ्या फिती लावून मूक आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here