आशाताई बच्छाव
वृक्षारोपण ही काळाची
गरज- उपसरपंच शेख नज़ीर
वृक्षारोपण करून स्वातंत्र्य दिन उत्साहात!
ज्ञानेश्वर पाटील युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ बुलढाणा :
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करून त्याचे संगोपण करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बावनबीर उपसरपंच शेख नज़ीर यांनी केले.संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे वृक्षाराेपण करून देशाचा ७८ वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आरोग्य उपकेंद्र येथे उपसरपंच शेख नज़ीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर आरोग्य उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थितांनी लावलेल्या झाडांचे संरक्षणाचा संकल्पही केला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा राऊत, ग्रा.पं.सदस्यपती वसीम मेंबर, वसीम काझी, सुरेश नांदोकार, बशीर पठाण, शेख कलीम, सुर्यसिंह ठाकुर, महेबूब पठाण, वसीम खान, शेख हसन, अजमत खान, असलम खान, शेख नाजीम, समीर शाह यांच्यासह जि.प.शाळेतील शिक्षक, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.