आशाताई बच्छाव
जालना झाले “बिहार”खुनाची मालिका सुरूच.
जालना शहरात दिवसा खुन, दरोडे, चोऱ्या, घरफोड्या, व्यापारी, शेतकरी यांची लुट यावरून जालणन्याचे बिहारच झाल्याचे नागरिकांची भावना
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक १८/०७/२०२४
याविषयी सविस्तर माहिती अशी की, जालना शहर मागील पंधरा दिवसात अनेक हत्या व खुनाच्या घटनांमुळे हादरले आहे. ही खुनाची मालिकाच ठरली आहे. त्यामुळे जालना शहरातील वातावरण भयभीत झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. शहरात अनेक गुंड सर्वसामान्य लोकांना त्रास देत असून धमक्या देतात व दिवसा चोऱ्या, घरफोड्या व्यापाऱ्यांची लूट करणे, खुन करणे, गरीब व सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करून त्यांना धमकावने अशा अनेक घटना शहरात घडत असून याकडे पोलीस पोलीस प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे . गुन्हेगारांना पोलिसांची भीती शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे गुन्ह्याची मालिका ही सतत सुरू असून ती कमी होण्याचे नाव घेत नाही. वाहनांच्या बाबतीत असेच काही पहावयास मिळते. बुलेट सारख्या टू व्हीलर गाडीमुळे कमालीचे ध्वनी प्रदूषण वाढले असून गाडी ची रेसिंग वाढविणे व हॉर्न वाजवून सर्वसामान्य नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे प्रकारही शहरात रोज वाढत आहेत. याकडेही पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
पोलीस प्रशासनाने गुन्हेगारावर करडी नजर ठेवून शासन केल्याशिवाय गुन्हेगारी कमी होणार नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे .परंतु पोलीस” चोर सोडून संन्याशाला फाशी देतात हे विशेष.ही एक शोकांतिकाच असल्याचे शहरातील नागरिक बोलत आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारावर करडी नजर ठेवून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.