आशाताई बच्छाव
व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लुट व छळ,मिरचीचे भाव माती मोल शेतकऱ्यांची फसवणूक
जाफराबाद तालुका प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
दिनांक १८/०७/२०२४
याविषयी सविस्तर वृत्त असे की,व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची दिवसेंदिवस लट वाढतच असून व्यापाऱ्यांनी मिरची मालाचे दर पाडले असुन मिरची उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे.याविषयी सविस्तर असे की,जाफराबाद येथे मिरची खरेदी करण्यासाठी व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात आणि शेतकऱ्यांची मिरची खरेदी करतात.जाफराबाद येथील मिरची मार्केटमध्ये शेतकऱ्यांची अतोनात लूट चालली असून त्यांचा छळ करण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती घेतली असता असे निदर्शनास आले की, जर मिरची खरेदी करतांना ४००० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे दर ठरला तरी व्यापारी शेतकऱ्यांना ३८०० रुपये प्रती क्विंटल ने पैसे देतात.एखादा शेतकरी सदर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांला विचारणा करण्यासाठी गेल्यास त्याला तुझा माल उचलून परत घेऊन जा अशा प्रकारे धमक्या दिल्या जातात.व शेतकऱ्यांसोबत अरेरावीची भाषा वापरली जाते.दुसरे असे की, जर एखाद्या शेतकऱ्याची करू १० हजार रुपये असेल तर त्यांना मार्केट कमिटीचा बटाव या शब्दाच्या नावाखाली ५०० ते ८०० रुपयांची लूट केली जाते. एक पोते ५५ .९० कीलो वजन भरले तर,ते ५३ किलो धरले जाते म्हणजे शेतकऱ्यांचे जवळ पास ३ कोलो मिरची कमी केली जाते.हा फटका शेतकऱ्यांना बसतो याकडे कृषी उत्पन्न बाजार पण बाजार समितीचे अधिकारी किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हे जानिवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत.व्यापाऱ्यांच्या काळ्या बाजाराकडे लक्ष देत नाही व्यापाऱ्यांचा हम करे सो कायदा या म्हणीप्रमाणे चालले आहे.व्यापारी शेतकऱ्यांचा अतोनात छळ करीत आहेत .आमचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना भेटले असता त्यांनी सांगितले की, हे सर्व अधिकारी भ्रष्ट आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हेव्यापाऱ्याकडून आपली चिरीमिरी घेऊन जातात आणि व्यापाऱ्यांना मोकाट सोडतात. जेणेकरून शेतकऱ्यांचे ,हाल -अपेष्टा होत आहे. जाफराबाद तालुक्यांमध्ये जवळपास 102 गावे असून त्या सर्व गावांचे केंद्रबिंदू म्हणजेच जाफराबाद येत आहे . याकडे कोणी लक्ष देईल का? शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही अशी भावना शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. कोणी आपली दखल घेऊन आपल्या मालाला भाव देईल का ? कि अशीच लूट होत राहील? आपला या जगामध्ये कोणी वाली आहे का? सरकार मायबापांनी शेतकऱ्याकडे लक्ष देऊन जगाचा पोशिंदा कोणी वाचवेल का? त्यांना जिवंत ठेवेल का? असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत आहेत.