आशाताई बच्छाव
अंतिम संस्कार म्हणजे काय, लोकप्रतिनिधींना कसा कळत नाही? -प्रेतांची अवहेलना !
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
नांदुरा :- बुलढाणा सध्या पावसाचे दिवस आहे. एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याचा अंतिम संस्कार कुठे करावा असा प्रश्न.. निर्माण झाला आहे.
एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तर दुसरीकडे स्मशान भूमी नसल्याने उघड्यावर केला जातो.
नांदुरा तालुक्याच्या दहिवडी गावात स्मशानभूमीअभावी प्रेताची होते अवहेलना होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली, संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय.. मात्र दुसरीकडे अनेक गावकऱ्यांमध्ये अजून स्मशानभूमीच नसल्याने प्रेतांची अवहेलना होण्याच्या अनेक घटना समोर येतात, अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा येथे घडली.
अनेक घटना समोर येतात, अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा येथे घडली.
काल काय झाले?
काल गावातील सुमनबाईतालुक्यातील दहिवडी गावांमध्ये समोर आली.
65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, त्यांच्या अंतिम संस्कार साठी प्रेत घेऊन गेल्यानंतर त्यांना अग्नी देताच पावसाला सुरुवात झाल्याने एकच तारांबळ उडाली, प्रेत पूर्णपणे जाळण्यासाठी गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली, तर यामुळे प्रेताची अवहेलना देखील झाल्याच पाहायला मिळाल.. देशात एकीकडे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना गाव खेड्यांमध्ये मूलभूत सुविधांचा देखील अभाव पाहायला मिळत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.. तर किमान टिन पत्र्याची तरी स्मशानभूमी या गावात उभी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली… ब्राह्मणे या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, त्यांच्या अंतिम संस्कार साठी प्रेत घेऊन गेल्यानंतर त्यांना अग्नी देताच पावसाला सुरुवात झाल्याने एकच तारांबळ उडाली, प्रेत पूर्णपणे जाळण्यासाठी गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली, तर यामुळे प्रेताची अवहेलना देखील झाल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळाल..