आशाताई बच्छाव
नागोठणे शहरात पूर परिस्थिती अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली !
युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन
अंबा नदीने रविवार 14 जुलै रोजी पहाटे धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम असून पुराचे पाणी शहरातील काही भागात शिरले. पुरामुळे शहरात मुख्य ठिकाणी येणारे तिन्ही रस्ते बंद झाल्याने तसेच एसटी स्थानकात पुराचे पाणी भरल्याने एसटी वाहतूक महामार्गावरून वळविण्यात आली आहे. नदी किनारील लहान मोठ्या दुकानदारांची धावपळ होऊन ताळांबळ उडाली आहे.
तसेच नागोठणे शहरात येणारे तिन्ही ठिकाणचे मुख्य रस्ते पाण्यामुळे बंद झाल्याने असून एस.टी. स्थानकात पाणी असल्याने एसटी वाहतूकीसह इतर वाहतूक महामार्गावरून वळवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तात्पुरत्या स्वरूपास बस थांबा देण्यात आला. एसटी बसने कामानिमित्त प्रवास करणारे प्रवाशी स्थानकात तसेच महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी असल्याने महामार्गाकडे जाण्यासाठी जोगेश्वरी मंदिर, बाळासाहेब ठाकरे नगर मार्गे पावसात जावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले असून त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
बाजार पेठेत शिरलेले पुराचे पाणी वाढले तर आपल्या दुकानात पाणी शिरेल या चिंतेत येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठेतील व्यापारी असून पावसाचा जोर कायम राहिला तर पुराचे पाणी निश्चित वाढणार असल्याचे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले होता. परंतु सुदैवाने बाजारपेठ, मोहल्ला कोळीवाडयासह इतर ठिकाणी शिरलेले पुराचे पाणी दुपारी 2.00 ते 3.30 च्या दरम्यान थिर राहिले असून जर का पाणी ओसरू लागले तर व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये असलेल्या भीतीचे वातावरण व चिंता थोड्या फार प्रमाणात कमी निच्छितच होणार आहे. पुरामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहा.पो.नि. सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बदोबस्त ठेवण्यात आला.