Home रायगड नागोठणे शहरात पूर परिस्थिती अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली !

नागोठणे शहरात पूर परिस्थिती अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली !

71
0

आशाताई बच्छाव

1000545779.jpg

नागोठणे शहरात पूर परिस्थिती अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली !

युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन

अंबा नदीने रविवार 14 जुलै रोजी पहाटे धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम असून पुराचे पाणी शहरातील काही भागात शिरले. पुरामुळे शहरात मुख्य ठिकाणी येणारे तिन्ही रस्ते बंद झाल्याने तसेच एसटी स्थानकात पुराचे पाणी भरल्याने एसटी वाहतूक महामार्गावरून वळविण्यात आली आहे. नदी किनारील लहान मोठ्या दुकानदारांची धावपळ होऊन ताळांबळ उडाली आहे.
तसेच नागोठणे शहरात येणारे तिन्ही ठिकाणचे मुख्य रस्ते पाण्यामुळे बंद झाल्याने असून एस.टी. स्थानकात पाणी असल्याने एसटी वाहतूकीसह इतर वाहतूक महामार्गावरून वळवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तात्पुरत्या स्वरूपास बस थांबा देण्यात आला. एसटी बसने कामानिमित्त प्रवास करणारे प्रवाशी स्थानकात तसेच महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी असल्याने महामार्गाकडे जाण्यासाठी जोगेश्वरी मंदिर, बाळासाहेब ठाकरे नगर मार्गे पावसात जावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले असून त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बाजार पेठेत शिरलेले पुराचे पाणी वाढले तर आपल्या दुकानात पाणी शिरेल या चिंतेत येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठेतील व्यापारी असून पावसाचा जोर कायम राहिला तर पुराचे पाणी निश्चित वाढणार असल्याचे मत जाणकार व्यक्तींनी व्यक्त केले होता. परंतु सुदैवाने बाजारपेठ, मोहल्ला कोळीवाडयासह इतर ठिकाणी शिरलेले पुराचे पाणी दुपारी 2.00 ते 3.30 च्या दरम्यान थिर राहिले असून जर का पाणी ओसरू लागले तर व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये असलेल्या भीतीचे वातावरण व चिंता थोड्या फार प्रमाणात कमी निच्छितच होणार आहे. पुरामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सहा.पो.नि. सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बदोबस्त ठेवण्यात आला.

Previous article११५ लोकांना मेळघाटात गॅस्ट्रोची लागण, दूषित पाण्याने आजार.
Next articleअमरावती येथील घटना भरधाव सिटी बसने आजी सह तीन नातवांना उडवले: नऊ वर्षे मुलाचा मृत्यू, आजी सह तीन जण गंभीर; बच्चूचा तडफडून मृत्यू 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here