आशाताई बच्छाव
ज्ञानेश्वर पाटील दांदळे/ब्युरो चीफ बुलढाणा :
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे सर्वजण त्रस्त
झालेले दिसत होते. पावसाळा लागून जवळपास महिना पूर्ण होत असून पुरेसा पाऊस येत नसल्याने शेतकरीही अडचणीत आलेला होता. मात्र काल ७ जुलैच्या सायंकाळपासून बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ग्रामीण भागात पुराचे भयानक दृश्य पहायला मिळत आहे. सुमारे २२ तास सुरू असलेल्या पावसामुळे खामगावातील अनेक वस्त्यांमध्ये तसेच घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या सामानाचे घरातील वस्तूचे नुकसान झाले आहे. पावसामुळे बुलढाणा-खामगाव, शेगाव आणि शेगावं ते वरवट रोडवरील कालखेल येथील पुलावरून पाणी असल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बऱ्याच वेळ ठप्प झाली होती त्यावेळेस पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच खामगाव येथील सुटाळा पुलावरून मोठा पूर गेल्याने चारचाकी वाहन व पानटपरी वाहत असल्याचे व्हिडिवो सोशल मीडियावर दिसून येत आहेत.