आशाताई बच्छाव
आचार्य विराग सागर महाराज यांचे समाधी समतापूर्वक मरण
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) जालना येथील देवमूर्ती येथे रात्री दोन वाजून 24 मिनिटांनी विरागसागर महाराज ह्यांचे शांततापूर्वक नमोकार मंत्र स्मरण करीत देह परिवर्तन झाले. आचार्य विराजसागर महाराज आचार्य विद्यासागर महाराजानंतर जैन समाजातील खूप मोठे आचार्य होते, त्यांनी आतापर्यंत जवळजवळ साडेतीनशे शिक्षा प्रदान केल्या आहेत आणि त्यांचे शिष्य पूर्ण भारत वर्षामध्ये धर्मप्रभावना करीत आहेत त्यांना दोन दिवसांपूर्वी काही वेदना झाल्या होत्या आणि डॉक्टरांनी सांगितले की आपणास मेडिकल घ्यावे लागेल दिगंबर जैन संत अहिंसेचे पालन व्यवस्थित करीत असल्याने ऍलोपॅथिक मेडिकलचा त्यांचा पूर्णपणे त्याग असतो त्यामुळे त्यांनी दिगंबर मुनीपरंपरेचे पालन करत मी प्राणाहून ही प्रिय असा दिगंबर वेश मेडिकल ऍलोपॅथिक ग्रहण करून मलीन करणार नाही असे प्रण केले व त्यांनी दिगंबर मुनीपरंपरेचे कट्टरतेने पालन करीत मुनीपरंपराची अंतिम साधना समाधी ही उत्कृष्टरित्या साध्य केली. जैन समाजाची ही एक अपूर्णयक्षती आहे पूर्ण भारत वर्षासोबतच संपूर्ण विश्वातून आचार्य महाराजांच्या प्रति विनयांजली समर्पित करण्यात आली अशा गुरुदेवांच्या चरणी सकल दिगंबर जैन समाज जालना कोटी कोटी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु निवेदन करून त्यांच्या आत्म्यास शीघ्र अति शीघ्र सिद्धपद प्राप्त होवो हीच भावना आहे.