आशाताई बच्छाव
एक रूपयात भरा पीकविमा; १५ जुलैची डेडलाईन
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड (देगलूर) :
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम- २०२४ साठी पीक विमा भरण्याची सुरुवात शासनाच्या पोर्टलद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी खरीपाचा पीकविमा भरावा, असे अवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी
शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत मोठा सहभाग घेतला होता. खरीप २०२४ साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही १४ पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. विमा योजनेत समाविष्ट पिकातभात (धान), खरीप
ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या १४ पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे
पिक निहाय विमा संरक्षित रक्कम
भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी
४०००० ते ५१७६०, ज्वारी २०००० ते ३२५००, बाजरी १८,००० ते ३३,९१३, नाचणी १३७५० ते २००००, मका ६००० ते ३५५९८, तूर २५००० ते ३६८०२, मुग २०००० ते २५८१७, उडीद २०००० ते २६०२५, भुईमुग २९००० ते ४२९७१, सोयाबीन ३१२५० ते ५७२६७, तीळ २२००० ते २५०००, कारळे १३७५०, कापूस २३००० ते ५९९८३, कांदा ४६००० ते ८१४२२.